AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला 328 कोटींचा दंड कायम, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

जालन्यात समृद्धी मार्ग बनवणाऱ्या गुजरातच्या कंपनीने जालना आणि बदनापूर तालुक्यात परवानगीशिवाय गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले होते. त्यामुळे या दोन्ही तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडून कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. सुप्रीम कोर्टानेही हा दंड कायम ठेवला आहे.

जालन्यात समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला 328 कोटींचा दंड कायम, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 06, 2021 | 3:33 PM
Share

औरंगाबादः मुंबई ते नागपूर या सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम जालना जिल्ह्यात करणाऱ्या गुजरातमधील एका कंपनीला ठोठावण्यात आलेला 328 कोटी रुपयांचा दंड सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. हा दंड रद्द करण्याची याचिका कंत्राटदार कंपनीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. आता कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, या वृत्ताने जालन्यात खळबळ माजली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

जालना जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग 25 गावांतून जातो. हे अंतर जवळपास 42 किलोमीटरचे असून यासाठीचे 1,300 कोटी रुपयांचे कंत्राट गुजरातमधील मेसर्स माँटेकार्लो कंपनीने केले आहे. हे काम करत असताना कंपनीने अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर मुरुम, माती तसेच वाळूसा उपसा केला जात होता. जालन्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यासाठी एक चौकशी समिती नेमली होती. याअंतर्गत जालना आणि बदनापूर तालुक्यात 328 कोटी रुपयांचे गौण खनिज परवानगीविना उत्खनन केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

कंपनीची कोर्टात धाव

या दोन्ही तहसीलदारांनी आकारलेल्या दंडाविरोधात कंपनीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात माजी आमदार संतोष सांबरे यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी होऊन कंपनीची याचिका फेटाळण्यात आली होती. या निकालाविरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तेथेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

इतर बातम्या-

Aurangabad: अमेरिकन महिलेच्या प्रेमात मॅनेजर, 3 लाख रुपये कधी गेले कळलेच नाही!

जिचं मुंडकं उडवून जीव घेतला, ती बहीण दोन महिन्यांची गरोदर, वैजापूर हत्या प्रकरणात दोन नवे ट्विस्ट

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी