AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला 328 कोटींचा दंड कायम, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

जालन्यात समृद्धी मार्ग बनवणाऱ्या गुजरातच्या कंपनीने जालना आणि बदनापूर तालुक्यात परवानगीशिवाय गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले होते. त्यामुळे या दोन्ही तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडून कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. सुप्रीम कोर्टानेही हा दंड कायम ठेवला आहे.

जालन्यात समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला 328 कोटींचा दंड कायम, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 3:33 PM
Share

औरंगाबादः मुंबई ते नागपूर या सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम जालना जिल्ह्यात करणाऱ्या गुजरातमधील एका कंपनीला ठोठावण्यात आलेला 328 कोटी रुपयांचा दंड सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. हा दंड रद्द करण्याची याचिका कंत्राटदार कंपनीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. आता कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, या वृत्ताने जालन्यात खळबळ माजली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

जालना जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग 25 गावांतून जातो. हे अंतर जवळपास 42 किलोमीटरचे असून यासाठीचे 1,300 कोटी रुपयांचे कंत्राट गुजरातमधील मेसर्स माँटेकार्लो कंपनीने केले आहे. हे काम करत असताना कंपनीने अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर मुरुम, माती तसेच वाळूसा उपसा केला जात होता. जालन्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यासाठी एक चौकशी समिती नेमली होती. याअंतर्गत जालना आणि बदनापूर तालुक्यात 328 कोटी रुपयांचे गौण खनिज परवानगीविना उत्खनन केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार कंपनीला 328 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

कंपनीची कोर्टात धाव

या दोन्ही तहसीलदारांनी आकारलेल्या दंडाविरोधात कंपनीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात माजी आमदार संतोष सांबरे यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी होऊन कंपनीची याचिका फेटाळण्यात आली होती. या निकालाविरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तेथेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

इतर बातम्या-

Aurangabad: अमेरिकन महिलेच्या प्रेमात मॅनेजर, 3 लाख रुपये कधी गेले कळलेच नाही!

जिचं मुंडकं उडवून जीव घेतला, ती बहीण दोन महिन्यांची गरोदर, वैजापूर हत्या प्रकरणात दोन नवे ट्विस्ट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.