AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवायफों के कोठे बंद करने आए थे, मगर… जयंत पाटलांची भरसभेत शेरोशायरी, भाजपवर जहरी टीका

भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी सांगलीत केली. सत्तेसाठी भाजप एमआयएम आणि काँग्रेससोबत युती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तवायफों के कोठे बंद करने आए थे, मगर...  जयंत पाटलांची भरसभेत शेरोशायरी, भाजपवर जहरी टीका
jayant patil devendra fadnavis
| Updated on: Jan 09, 2026 | 1:31 PM
Share

भारतीय जनता पक्षाची अवस्था सध्या पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर गावात तमाशा बंद करायला आले होते, पण तमाशाचा नाद त्यांना असा काही लागला की, शेवटी तेच तुणतुणं घेऊन फडावर सर्वात पुढे उभे राहिले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. ते सांगलीत बोलत होते.

जयंत पाटलांनी घेतला शायरीचा आधार

सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ एक सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपच्या बदलत्या राजकीय भूमिकेचा समाचार घेताना शायरीचा आधार घेतला. ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर; सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे…” असा शेर त्यांनी ऐकताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी संपूर्ण मैदान दणाणून सोडले.

यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे

जयंत पाटील यांनी अकोट येथील एमआयएम (MIM) आणि अंबरनाथमधील काँग्रेससोबतच्या भाजपच्या युतीवर बोट ठेवले. ते म्हणाले, भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते. मात्र अकोल्यात त्यांनी ज्या एमआयएम आणि ओवेसींवर नेहमी टीका केली, त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. सत्तेसाठी कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसायला यांना काही वाटत नाही. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, हे आता जनतेने ओळखावे, असे जयंत पाटील म्हणाले.

भाजप आज स्वतःच काँग्रेसयुक्त झाला

यावेळी जयंत पाटील यांनी १९९६ सालच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपला सर्वाधिक जागा असूनही त्यांनी तत्त्वासाठी बहुमत नसताना सत्ता सोडली होती. पण आजचा भाजप केवळ सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसमधील नेत्यांना फोडून पक्षात घेत आहे. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारा भाजप आज स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी निशाणा साधला.

सांगलीतील जनता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी

सांगली शहरात झालेली विकासकामे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झाली असल्याचे जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले. रक्त तपासणीसाठी मोफत व्यवस्था, बचत गटांसाठी बाजार कट्टा, वंदेश वाडी हॉस्पिटलसाठी ५ कोटींचा निधी, कृष्णघाट आणि सांगली-मिरज रस्ते ही आमची कामे आहेत. सांगलीची स्वाभिमानी जनता सत्तेच्या अमिषाला बळी न पडता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल असा दावा केला. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत आम्ही एकत्रित ताकदीने मैदानात उतरलो आहोत. सांगलीकरांची विवेक बुद्धी जागृत आहे, त्यामुळे महापौर आमचाच होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...