AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सूचक विधान अन् आता…; जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?

दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, माझं काही खर नाही, माझी ग्यारंटी घेऊ नका असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून चर्चेला उधाण आलं असताना त्यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आधी सूचक विधान अन् आता...; जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?
jayant patilImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 14, 2025 | 3:16 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं.  माझं काही खरं नाही, माझी ग्यारंटी घेऊ नका असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली, आता त्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

मी नाराज वैगरे काही नाही, तशीही मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलं त्याचा रेफरन्स बघा. शक्तीपीठ रस्त्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यांच्यासमोर भाषण करताना मी ते म्हंटलो होतो. राजू शेट्टी यांनी झेंडा हातात घेतलाय म्हंटल्यावर काही काळजीच कारण नाही. हा विनोदाचा भाग होता. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. ‘त्यामुळे माझे तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ अशी त्यामागची भावना होती, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आम्ही एका कुटुंबातील सर्वजण आहोत, आम्ही कुणाला इशारा देत बसत नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे तो पक्षाच्या हिताचाच घेऊ, त्यामुळे मी इकडे जाणार तिकडे जाणार हा विषय होऊ शकत नाही, आणि होणारही नाही, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मल्हार सर्टिफिकेटवरून देखील जोरदार हल्लाबोल केला. हे फार शॉकिंग आहे, असा प्रचार करणं हे चुकीचं आहे. माणूस कुठल्या जातीत जन्माला यायचं हे ठरवून येत नाही. नितेश राणे यांनी ठरवलेलं नाही की कोणी कुणाच्या पोटी जन्माला यायचं. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते माणुसकीच्या बाहेर जाऊन बोलत आहेत. त्यांनी धर्माच्या काही गोष्टी असतील तर त्या मांडल्या पाहिजेत पण दुसऱ्याच्या धर्माची हेटाळणी करणं चुकीचं आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.