AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : राजकारणात काहीही होऊ शकतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं सुखावह धक्का, नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणं राजकारणात काहीही होऊ शकतं हे दाखवणारं आहे. तसेच ते मुख्यमंत्री होणं सुखावह धक्का अशी प्रतिक्रिया देत जितेंद आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

Jitendra Awhad : राजकारणात काहीही होऊ शकतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं सुखावह धक्का, नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राजकारणात काहीही होऊ शकतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं सुखावह धक्का, नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?Image Credit source: tv9
| Updated on: Jun 30, 2022 | 6:23 PM
Share

मुंबई : राज्याचं राजकारण सध्या चांगलच सरप्राईज मोडवर आहे. गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड होण हे सरप्राईजिंग वाटत होतं. मात्र त्यांच्याच नावाची घोषणा ही मुख्यमंत्रिपदासाठी होणं हेही अनेकांसाठी सरप्राईज ठरलं आहे. तयारी केली फडणवीसांची (Devendra Fadnavis) पेपर  आला एकनाथ शिंदे यांचा अशी अवस्थाही सध्या अनेकांची झाली आहे. अनेक राजकीय पंडितांच्या अंदाजही हुकली आहे. यावर आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया आली (Maharashtra Government Cabinet) आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणं राजकारणात काहीही होऊ शकतं हे दाखवणारं आहे. तसेच ते मुख्यमंत्री होणं सुखावह धक्का अशी प्रतिक्रिया देत जितेंद आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे यांचा प्रवास बघणारा कार्यकर्ता म्हणून मी पाहिला आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.

कधीच तंगड्यात तंगडं घातलं नाही

मुख्यमंत्री हा आपल्या शहराचा विकास करतो. त्यामुळे आता ठाण्याचा आणखी चांगला विकास होईल. आम्ही अनेक वर्षांपासान राजकारणात आहे. आजही आमचा समोरासमोर वाद झाला नाही. काही ठिकाणी वाद झाले मात्र ते टोकाचे नव्हते. आम्ही कधीच एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालण्याचं काम कधी केलं नाही, असेही आव्हाड म्हणाले आहेत. संघर्ष होत असतो. एक ठाणेकर म्हणून, त्यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केल्याने मी त्यांचं स्वागतच करेन. माझ्या मतदारसंघासाठी मला कुणाच्या दारात जायला कमीपणा वाटणार नाही. मला ते मदत करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आता घरी जाताना विचारावं लागेल

मुख्यमंत्री झाल्यावर सर्वांना समान वागणूक द्यावी लागते. त्यामुळे तेही तशी वागणूक देतील हा मला विश्वास आहे. आजपर्यंत घरी जाताना कुणाच्या कधी विचारावं लागलं नाही. मात्र आता कदाचित परिस्थिती बदलेल. मात्र तरीही जितेंद्र आव्हाड त्यांच्या घरी जाईल आणि माझ्या मतदारसंघासाठी जे हवं ते मागेल, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्याकडूनही स्वागत

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिंदेंचं स्वागत केलं आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असे ट्विट हे शरद पवार यांच्याकडून करण्यात आलं आहे.

शरद पवार यांचं ट्विट

पाहा व्हिडिओ

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.