AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्महत्येशिवाय पर्यायच नाही… डोंबिवलीकरांचा इशारा, 65 इमारतींचा वाद पेटला, नोटिसा येताच…

KDMC : डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

आत्महत्येशिवाय पर्यायच नाही... डोंबिवलीकरांचा इशारा, 65 इमारतींचा वाद पेटला, नोटिसा येताच...
KDMC NewsImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 22, 2026 | 6:26 PM
Share

महापालिकेच्या निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे दिलेले आश्वासन असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरांचे कर्ज सुरू, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आणि डोक्यावर कारवाईची टांगती तलवार; यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे.

65 इमारतींचा वाद पेटला

कल्याण-डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्याशी संबंधित 65 इमारतींपैकी डोंबिवली आयरेगाव परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीला पुन्हा एकदा पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे.जागामालकाच्या वादातून न्यायालयाने संबंधित इमारत निष्काशीत करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश

समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीतील रहिवाशांना सहा तारखेपूर्वी घरे रिकामी करण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत. मात्र, मागील वर्षभर सुरू असलेल्या या वादात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी इमारतींवर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. तरीही पुन्हा नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. समर्थ कॉम्प्लेक्समधील अनेक कुटुंबांनी आयुष्याची जमापुंजी या घरात गुंतवली आहे. बहुतांश घरांवर बँकेचे कर्ज सुरू असून, परीक्षांचा कालावधी असल्यामुळे विद्यार्थ्यांवरही मानसिक ताण वाढला आहे.

आत्महत्येशिवाय पर्याय नाही…

पालिकेकडून नोटीस आल्यानंतर रहिवासी महिलांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आम्ही घर घेऊन चूक केली का? जर कारवाई करणार असाल, तर आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही’ असा टाहो महिलांनी फोडला. दरम्यान, सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले की ही इमारत 65 इमारतींच्याच यादीतील असून न्यायालयीन आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. आता या प्रकरणात सरकार, राजकीय नेते, पालिका प्रशासन आणि न्यायालय यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.