AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केडीएमसीत महायुतीत वादाची ठिणगी, महापालिकेच्या सत्तेचा पेच संपेना, आता काय घडलं?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीपदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. या सत्तासंघर्षामुळे महापालिकेची महासभा रखडली असून नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

केडीएमसीत महायुतीत वादाची ठिणगी, महापालिकेच्या सत्तेचा पेच संपेना, आता काय घडलं?
kalyan dombivali
| Updated on: Mar 05, 2026 | 10:40 AM
Share

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप सत्तेचे समीकरण पूर्णपणे सुटलेले नाही. कल्याण डोंबिवलीचे महापौर पद पदरात पाडून घेतल्यानंतर आता तिजोरीच्या चाव्या म्हणजेच स्थायी समिती (Standing Committee) कोणाकडे राहणार? यावरुन सध्या रणकंदन सुरु आहे. सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या वादामुळे महापालिकेची पहिली महासभा लांबणीवर पडली आहे. यामुळे नगरसेवक निवडून येऊनही शहराचे प्रश्न मात्र जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहेत.

महापौर तुमचा, मग स्टँडिंग आमचे

भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी या वादात आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीमध्ये सत्तेचे समसमान वाटप होणे गरजेचे आहे. महापौर पद शिवसेनेकडे गेले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने आणि मित्रत्वाच्या नात्याने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते ही पदे भाजपकडेच असायला हवीत. दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन यावर तोडगा निघेल, असा विश्वास नंदू परब यांनी व्यक्त केला. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या विषयावर खलबतं सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

शिवसेनेचा पलटवार

भाजपच्या या दाव्याला शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी भाजपच्या मागण्या धुडकावून लावताना सांगितले की, भाजप काय बोलते हा आमचा विषय नाही. आमचे सर्व निर्णय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच होतील. मात्र, स्थायी समिती आमच्याकडेच राहिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे अरविंद मोरे म्हणाले. येत्या दोन दिवसांत बैठक होऊन स्टँडिंग सदस्य निवड, महिला व बालकल्याण समितीसह अन्य समित्यांची पदे जाहीर होतील, असेही मोरे यांनी सांगितले.

राज्यातील महापालिकांची निवडणूक १५ डिसेंबरला जाहीर झाली. १५ जानेवारीला मतदान पार पडले आणि १६ जानेवारीला १२२ नगरसेवकांचे भवितव्य स्पष्ट झाले. ३ फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवड झाली. मात्र, त्यानंतर होणारी महासभा अद्याप पार पडलेली नाही. स्थायी समितीच्या सदस्यांची निवड झाल्याशिवाय बजेट आणि मोठ्या विकासकामांना मंजुरी मिळत नाही. परिणामी शहराचे प्रशासन ठप्प झाल्यासारखी परिस्थिती आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये तीव्र संताप

सत्ताधारी पक्षांमधील या अंतर्गत कलहाचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची खड्डेमय अवस्था, कचरा कोंडी आणि आरोग्य सुविधा यांसारखे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन नगरसेवक निवडून आल्यामुळे कामांना वेग येईल, अशी अपेक्षा सर्व कल्याण डोंबिवलीकरांना होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरताना दिसत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...