AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ व्यक्तीचा फोन आला अन् मधुरिमाराजेंनी माघार घेतली; मविआच्या नेत्याने कारण सांगितलं

Congress Leader on Madhurima Raje Withdraw : काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी काल कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर कोल्हापूरमधील यंदाच्या या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं. मात्र मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? याचं कारण आता समोर आलं आहे.

'त्या' व्यक्तीचा फोन आला अन् मधुरिमाराजेंनी माघार घेतली; मविआच्या नेत्याने कारण सांगितलं
मधुरिमाराजेImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 05, 2024 | 11:57 AM
Share

उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अवघी 10- 12 मिनिटं असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा झालेला संताप महाराष्ट्राने पाहिला. पण ऐनवेळी मधुरिमा राजे यांनी माघार का घेतली? याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर कोल्हापूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी प्रतिक्रिया दिली आहे. काहीही ठरवून झालेलं नाही. राजू लाटकर यांच्या वडिलांचा फोन आला आणि मधुरिमाराजे यांनी माघार घेण्याचं ठरवलं. त्यांचा फोन माघार घ्यायला कारणीभूत ठरलेली आहे, असं सुनील मोदी यांनी सांगितलं.

सुनील मोदी यांनी कारण सांंगितलं

आता कोल्हापूरच्या जनतेला पुरोगामी विचार पटवून देणार आहोत. महाराजांशी आम्ही बोललो तेव्हा ते म्हणाले की चिन्हा पेक्षा विचार महत्वाचा आहे. जर राजू लाटकांना काँग्रेसने पाठिंबा दिला तर स्वत: शाहू महाराज छत्रपतीदेखील प्रचार करताना दिसतील, असंही सुनील मोदी यांनी सांगितलं.

मधुरिमाराजेंनी माघार घेतली तेव्हा काय घडलं?

राजू लाटकर यांच्याशी मी स्वत: बोललो होतो. कोणत्याही परिस्थितीत राजू लाटकर हे माघार घेणार, हेच ठरलं होतं. आम्ही राजू लाटकरांच्या संपर्कात होतो. राजू लाटकर यांना भेटूनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. ते पावणे तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येणार होते. 2. 35 मिनिटांनंतर सगळं बदललं. मधुरिमा राजे यांना मी देखील विनंती केली होती की तुम्ही माघार घेऊ नका. मी त्यांना थांबवतोय म्हटल्यानंतर महाराज स्वत: आले. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे उमेदवारी मागे घेणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी मला सुनावलं, असं सुनील मोदींनी म्हटलं.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन करण्यात आलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या बैठकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी प्रतिक्रिया दिलाी आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.