AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Corona | कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

गेल्या काही दिवसात जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक जणांनी प्रवेश केला आहे.

Kolhapur Corona | कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 28, 2020 | 8:51 PM
Share

कोल्हापूर : मोठ्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत (Kolhapur Corona Migrants Update) असल्याने या शहरात असलेल्या चाकरमान्यांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे. कोरोनाची भीती, लॉकडाऊनमूळे उद्योग धंद्यात तयार झालेलं अस्थिरतेच वातावरण यामुळे लाखो परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात जाणे पसंत केलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसात जिल्ह्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक जणांनी प्रवेश केला आहे. तर जिल्ह्यातील 43 हजार परप्रांतीय मजूर श्रमिक ट्रेनने आपल्या (Kolhapur Corona Migrants Update) राज्यात रवाना झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 450 ज्या जवळ पोहचला असला तरी यातील बहुतांशी रुग्ण हे रेड झोन मधून आलेले आहेत. रेड झोन मधील शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले लोक आपापल्या जिल्ह्यात परतले.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात दीड लाखाहून अधिक जणांनी प्रवेश केला असून यात सर्वाधिक संख्या मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची आहे. रेड झोनमधून येणाऱ्या सर्वांची तपासणी आणि स्वॅब घेण्याचा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वांसाठी 1,470 कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले असून दोन लॅबच्या माध्यमातून या सर्वांच्या स्वॅबची तपासणी होत आहे. स्वॅब तपासणी अहवालानंतरच संबंधितांना पुढे प्रवेश दिला जात असल्याने सामाजिक संसर्गला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जशी मोठे आहे, तसे कोल्हापुरातून परराज्यात किंवा आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या लोकांची संख्या काही हजारात आहे. जिल्ह्यातील शिरोली कागल गोकुळ शिरगाव अशा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे हजारो कामगार आपापल्या राज्यात परत (Kolhapur Corona Migrants Update) गेले आहेत.

परराज्यातील 43 हजार मजूर आतापर्यंत 34 ट्रेन मधून रवाना झाले आहेत. तर लॉकडाऊनलोड कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेले इतर जिल्ह्यातील 15 हजारहून अधिक प्रवासी आपापल्या जिल्ह्यात सुरक्षितपणे पोहोचले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या मजुर, प्रवासी, यात्रेकरु यांच्या संख्येवर एक नजर

उत्तरप्रदेशमधील 16750, बिहारमधील 11504, मध्यप्रदेशमधील 2650, झारखंडमधील 2138, छत्तीसगडमधील 275, राजस्थानमधील 3620, गुजरातमधील 302, गोवामधील 490, कर्नाटकमधील 3398, आंध्रप्रदेशमधील 94, तेलंगनामधील 178, केरळमधील 74, तामिळनाडूमधील 369, ओरीसामधील 955, पश्चिम बंगालमधील 277, दिल्लीमधील 40, पूर्वेकडील राज्य 193, आणि इतर 171 असे एकूण 43 हजार 478 जण रवाना झाले आहेत.

राज्यातील मुंबई शहर 110, मुंबई उपनगर 16, ठाणेमधील 605, पालघरमधील 118, रायगडमधील 167, रत्नागिरीमधील 644, सिंधुदुर्गमधील 593, सातारामधील 706, सांगलीमधील 1852, सोलापूरमधील 2345, पुण्यामधील 2373, नाशिकमधील 288, धुळे 264, जळगावमधील 164, नंदुरबारमधील 168, अहमदनगरमधील 1138, औरंगाबादमधील 108, बीड 339, जालनामधील 88, उस्मानाबादमधील 775, लातुरमधील 1030, नांदेडमधील 272, परभणीमधील 435, हिंगोली 82, आमरावती 36, अकोलामधील 91, बुलढाणामधील 79, यवतमाळमधील 160, वाशिम 104, नागपूरमधील 57, भंडारा 36, वर्धा 46, गडचिरोली 37, चंद्रपूरमधील 90 आणि गोंदियामधील 114 असे एकूण 15 हजार 580 जण रवाना झाले (Kolhapur Corona Migrants Update) आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे रिटर्नने बुलडाण्यात कोरोनाबाधितांची वाढ, आतापर्यंत 48 जणांना लागण

मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित

प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त

कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..