AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Rain Update: पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे; जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

कोल्हापूरसह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची तातडीची आढावा बैठक घेऊन पूर स्थितीच्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Kolhapur Rain Update: पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे; जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
कोल्हापूरात पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे
| Updated on: Jul 05, 2022 | 6:03 PM
Share

कोल्हापूर: राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबईसह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, अमरावती भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने कोल्हापूरातील पंचगंगा (Panchganga River) नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पावसाचा जोर असाच कायम राहिला तर उद्या सकाळपर्यंत पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी वर्तवली आहे.

नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावानाही सतर्कतेचा इशारा (Red Alert) देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नद्यांना पूर

कोल्हापूरसह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची तातडीची आढावा बैठक घेऊन पूर स्थितीच्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिरोळ, हातकणंगले करवीरमधील गावांना इशारा

कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक तालुक्यातून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठक घेऊन प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, हातकणंगले करवीर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना धोका

पावसाचा जोर वाढत असून नदीकाठच्या गावांना धोका असल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले आहे की, पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.