AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

निलंगा शहरातून गावाकडे निघालेल्या दुचाकीला भरधावात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरील दोघेही मित्र होते. रात्री उशिरा गावाकडे जात असताना निलंगा-औराद शहाजनी मार्गावरील एका पूलावर ही दुर्घटना घडली आहे. गाव 10 किमी अंतरावर असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

Latur : गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू
गुंजरगा येथील बालाजी राम शिंदे व सूर्यकांत वाघंबर शिंदे या दोघांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 08, 2022 | 12:18 PM
Share

लातूर : निलंगा शहरातून गावाकडे निघालेल्या (Two Wheeler) दुचाकीला भरधावात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने (Two Death) दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरील दोघेही मित्र होते. रात्री उशिरा गावाकडे जात असताना (Nilanga) निलंगा-औराद शहाजनी मार्गावरील एका पूलावर ही दुर्घटना घडली आहे. गाव 10 किमी अंतरावर असतानाच ही दुर्घटना घडली आहे. गुंजरगा येथील बालाजी राम शिंदे व सूर्यकांत वाघंबर शिंदे या दोघांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरा दुचाकीवर निघाले होते गावाकडे

बालाजी शिंदे व सूर्यकांत शिंदे हे लहानपनापासूनचे मित्र होते. कामानिमित्त ते बुधवारी निलंगा शहरात आले होते. काम आटोपून निलंग्याहून रात्री ते उशिरा गुंजरगा या गावाकडे निघाले होते. दरम्यान, निलंगा-औराद रोडवरील उदगीर मोडपासून जवळच असलेल्या ज्ञानोबा बोधले यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

वाहनाचा तपास सुरु, गावात शोककळा

या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने गुंजरगा गावावर शोककळा पसरली होती. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. उपचारासाठी त्या दोघांना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निलंगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Aasaram | आसारामच्या आश्रमात मृतदेह सापडला, बेपत्ता अल्पवयीन मुलगी कारमध्ये मृतावस्थेत

CCTV | हिशेब दिला नाही, बापाने 25 वर्षांच्या लेकाला जिवंत जाळलं, पेटलेल्या अवस्थेत पोरगा सैरावैरा

Aurangabad | मराठवाड्यात हल्ल्याचे सत्र सुरूच, Nanded हत्याकांडानंतर औरंगाबादेत व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर