AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवेंनी अर्ज दाखल करताच भाजपचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. भाजपनं या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

अंबादास दानवेंनी अर्ज दाखल करताच भाजपचा मोठा निर्णय, विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड
ambadas danve Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 3:28 PM
Share

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजप अतिरिक्त उमेदवार देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.  मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात आलेला नाही, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 9 जागांचा कोटा होता, यामध्ये भाजपच्या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येकी एका उमेदवाराने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळेस अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.  जर उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली तर आम्ही उमेदवार देणार नाही असं शिवसेना शिंदे गट आणि भाजपने म्हटलं होतं. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजप तसेच शिवसेनेकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. अंबादास दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसचा ही पाठिंबा 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच उमेदवार देण्याचे संकेत देखील दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.  त्यानी अंबादास दानवे यांना आपाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोणताही अतिरिक्त उमेदवार नसल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Follow Us
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....
आमचे दोन किंवा तीन उमेदवार... बच्चू कडूंच्या पक्ष प्रवेशाबाबत उदय सामं
आमचे दोन किंवा तीन उमेदवार... बच्चू कडूंच्या पक्ष प्रवेशाबाबत उदय सामं.
मविआत तणाव शिगेला! ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला, बिनविरोध....
मविआत तणाव शिगेला! ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला, बिनविरोध.....
सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल
सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी हा इशारा वाचाच... मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र
घरातून बाहेर पडण्यापूर्वी हा इशारा वाचाच... मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र.
विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची गांधीभवनात बैठक, नेमकं काय
विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची गांधीभवनात बैठक, नेमकं काय.
महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, संजय राऊतांचा काँग्रेसला टोला.