AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरलंय, लाल संविधान दाखवून तुम्ही…” देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

"भारत जोडो समूहामध्ये सहभागी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय एक्सट्रीम डाव्या विचारायचे आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत बघितली तर ती अराजकता पसरवण्याची आहे", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरलंय, लाल संविधान दाखवून तुम्ही... देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
| Updated on: Nov 06, 2024 | 11:47 AM
Share

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकासाआघाडी जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना या मुलाखतीत नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली होती, यावरुन प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, “राहुल गांधी हे आता काँग्रेस राहिले नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली आहे. ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. त्यामुळेच ते ओरिजनल निळ्या रंगाऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात”, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

भारत जोडो यात्रा अराजकता पसरवणारी

“राहुल गांधी यांनी भारत जोडो सुरू केलं होतं तेव्हा चांगली योजना आहे वाटलं होतं. किमान भारत त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण त्यात १८० अशा संघटनांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये अराजकता पसरवणारे होते. हे रेकॉर्डवर आहे. राहुल गांधींनी एका हातात संविधान धरलंय पण त्यांचं काम मात्र अराजकता पसरवणारं आहे. भारत जोडो समूहामध्ये सहभागी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय एक्सट्रीम डाव्या विचारायचे आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत बघितली तर ती अराजकता पसरवण्याची आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम

“एन आर के सिस्टीम असं आपण त्याला म्हणूया. राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे पण मग लाल संविधान का? लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असो ऑर्डर आणि एन आर के चा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम याठिकाणी होत आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.

“अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही”

अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेच रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हेच काम अराजकतेला पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला

Follow Us
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.