AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक नॉट रिचेबल, दुसरा मुलाच्या हाती तुतारी देण्यास आतूर; अजित पवारांना मोठा धक्का, दोन आमदार लवकरच करणार रामराम?

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे दोन आमदार सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एक नॉट रिचेबल, दुसरा मुलाच्या हाती तुतारी देण्यास आतूर; अजित पवारांना मोठा धक्का, दोन आमदार लवकरच करणार रामराम?
उपमुख्यमंत्री अजित पवार
| Updated on: Oct 16, 2024 | 3:05 PM
Share

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल आणि निकालाची घोषणा होईल. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे दोन आमदार सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांना दोन मोठे धक्के

अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा रणजितसिंह निवडणूक लढवेल असे सांगितले आहे. विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी मुलासाठी शरद पवार गटाकडे तिकीटाची मागणी केल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना दोन मोठे धक्के बसणार आहेत.

सतीश चव्हाण नॉट रिचेबल

महायुती सरकारच्या विरोधात पत्र लिहिणारे आमदार सतीश चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल झाले आहेत. सतीश चव्हाण यांनी सरकारविरोधात पत्र लिहिल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे. यामुळे सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सतीश चव्हाण यांनी अजित पवार किंवा महायुतीच्या नेत्यांचा संपर्क होऊ नये, म्हणून फोन बंद केला असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश चव्हाण हे अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सतीश चव्हाण शरद पवार गटात जाणार असल्याचे बोललं जात आहे किंवा ते अपक्ष निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. सतीश चव्हाण हे लवकरच मुंबईत बड्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बबनराव शिंदेंचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

तर दुसरीकडे सोलापूर जिल्हात अजित पवार गटाला आणखी धक्का बसणार आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मला आता तब्येत साथ देत नाही. त्यामुळे मी माझा मुलगा रणजितसिंहला निवडणुकीला उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली आहे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.

मुलाला उमेदवारी देण्याचा निर्णय

मी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी मी शरद पवारांकडे मुलाच्या उमेदवारीची मागणी केली आहे. मी रणजितसिंहसाठी शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे. यावेळी शरद पवार हे विचार करतो असे म्हणाले आहेत. रणजित सिंह हा तुमच्याकडून उभा राहण्यास तयार आहे. शरद पवारांनी उमेदवारीबद्दल विचारणा करतोय, अशी माहिती बबनराव शिंदे यांनी दिली.

तसेच जर शरद पवारांनी तिकीट नाही दिले तर १९९५ सालच्या निवडणुकीसारखी अपक्ष छत्री हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात मुलाला उतरवू, असा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अजित पवार गटातील हे दोन आमदार शरद पवार गटातून लढणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.