AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटलांच्या हातातील स्टेअरिंगवरून संजय राऊत यांची कोपरखळी, म्हणाले “उद्या 10 वाजता…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत यांनी उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.

जयंत पाटलांच्या हातातील स्टेअरिंगवरून संजय राऊत यांची कोपरखळी, म्हणाले उद्या 10 वाजता...
sanjay raut
| Updated on: Nov 22, 2024 | 1:53 PM
Share

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महायुती आणि महाविकासआघाडीत मुख्यमंत्री कोण असणार यावरुन चर्चा सुरु आहेत.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्रि‍पदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय हा महाराष्ट्र मुंबईतून होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, ते दिल्लीतून मुंबईला येतील. उद्या सकाळी १० नंतर मी मुख्यमंत्री कोण असेल हे सांगेन, असे विधान संजय राऊतांनी केले.

महाराष्ट्रात महिलांनी गुलामी विरोधात बंड करुन मतदान केलेलं आहे. आम्ही १६० जागा जिंकतो आहे. यावर आमची सर्व घटक पक्षांसोबत चर्चा केली आहे. मी लवकरच शरद पवारांना भेटणार आहे. आम्ही १६० जागा जिंकल्यानंतर राज्यपालांनी कितीही प्रयत्न केले, तरी निवडणूक पूर्वी ज्यांचं बहुमत आहे, त्यांना राज्यापालांना बोलावावं लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील

मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्र मुंबईतून होईल, काँग्रेसचे जे प्रमुख नेते दिल्लीतून येथे येतील. त्यामुळे त्यांना मँडेट घेऊन यावं लागेल. आम्ही कोणताही वेळ न घालवता मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ. नाहीतर भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. इतके ते क्रूर आणि निर्घृण आहेत. घाईघाईत ते गौतम अदानीलाही मुख्यमंत्री करतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

“जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात”

“मी उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार आहे. महाविकासआघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे. त्यातील गाडीत बसलेले आहेत ते सर्व ड्रायव्हर निषणात आहेत. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत. त्यांना उत्तम वाहन चालवता येतं. हा माझा अनुभव आहे. काही लोकांना ड्रायव्हिंग पॅशन असतं. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील अनुभव नव्हता तरी देखील त्यांनी सरकार चालवलं”, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.