AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटलांच्या हातातील स्टेअरिंगवरून संजय राऊत यांची कोपरखळी, म्हणाले “उद्या 10 वाजता…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत यांनी उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत.

जयंत पाटलांच्या हातातील स्टेअरिंगवरून संजय राऊत यांची कोपरखळी, म्हणाले उद्या 10 वाजता...
sanjay raut
| Updated on: Nov 22, 2024 | 1:53 PM
Share

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महायुती आणि महाविकासआघाडीत मुख्यमंत्री कोण असणार यावरुन चर्चा सुरु आहेत.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्रि‍पदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. राज्यातील मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय हा महाराष्ट्र मुंबईतून होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, ते दिल्लीतून मुंबईला येतील. उद्या सकाळी १० नंतर मी मुख्यमंत्री कोण असेल हे सांगेन, असे विधान संजय राऊतांनी केले.

महाराष्ट्रात महिलांनी गुलामी विरोधात बंड करुन मतदान केलेलं आहे. आम्ही १६० जागा जिंकतो आहे. यावर आमची सर्व घटक पक्षांसोबत चर्चा केली आहे. मी लवकरच शरद पवारांना भेटणार आहे. आम्ही १६० जागा जिंकल्यानंतर राज्यपालांनी कितीही प्रयत्न केले, तरी निवडणूक पूर्वी ज्यांचं बहुमत आहे, त्यांना राज्यापालांना बोलावावं लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील

मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्र मुंबईतून होईल, काँग्रेसचे जे प्रमुख नेते दिल्लीतून येथे येतील. त्यामुळे त्यांना मँडेट घेऊन यावं लागेल. आम्ही कोणताही वेळ न घालवता मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ. नाहीतर भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. इतके ते क्रूर आणि निर्घृण आहेत. घाईघाईत ते गौतम अदानीलाही मुख्यमंत्री करतील, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

“जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात”

“मी उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार आहे. महाविकासआघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे. त्यातील गाडीत बसलेले आहेत ते सर्व ड्रायव्हर निषणात आहेत. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत. त्यांना उत्तम वाहन चालवता येतं. हा माझा अनुभव आहे. काही लोकांना ड्रायव्हिंग पॅशन असतं. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील अनुभव नव्हता तरी देखील त्यांनी सरकार चालवलं”, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ