AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीला धक्का, त्या मतदारसंघांबाबत घेतला मोठा निर्णय!

सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीला धक्का, त्या मतदारसंघांबाबत घेतला मोठा निर्णय!
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Nov 02, 2024 | 5:39 PM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान असे देखील काही विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. सोलापूरमधल्या दोन विधानसभा मतदारसंघात जिथे महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होते आहे, तिथे आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.  महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत असलेल्या सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सांगोला आणि दक्षिण सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत.

सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इथे महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत आहे. तर दुसरीकडे सांगोल्यातून शिवसेना शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सांगोल्यात सभा घेणार आहेत. याबाबत  शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी माहिती दिली.

बंडखोरांमुळे वाढणार डोकेदुखी? 

सध्याच्या राजकीय परिस्थिमुळे महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं समोर आलं आहे. पक्षीय समीकरण बदल्यामुळे अनेकांना इच्छूक असूनही पक्षानं तिकीट न दिल्यानं अशा उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. चार नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या बंडखोर उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या उमेदवारांची समजून काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्याचं मोठं आव्हान हे दोन्ही बाजुंच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे, अन्यथा त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा