AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पण अद्याप खातेवाटप नाही, महायुतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे?

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपात होणारा विलंब होत आहे. ३९ नवीन मंत्र्यांना शपथ घेतल्यानंतरही खातेवाटप होण्यास उशीर झाल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. मंत्र्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असून, काही मंत्र्यांनी लवकरच खातेवाटप होईल असे आश्वस्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पण अद्याप खातेवाटप नाही, महायुतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे?
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 17, 2024 | 3:48 PM
Share

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले. महायुतीत मंत्रिमंडळ विस्तारात अनेक माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर काही इच्छुक आमदारांना डावलण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ४ महिला आमदारांची वर्णी लागली. मंत्रिमंडळ विस्तार होऊन दोन दिवस उलटले असले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन आता विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने अनेक दिग्गज नाराज झाले आहेत. यातील अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खातेवाटपावरुन सातत्याने खलबतं सुरु आहेत. तसेच कोणाला कोणते खाते मिळणार? यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. “महायुतीत खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही. येत्या दोन दिवसात यावर चर्चा करुन निर्णय होईल. सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम आहे”, असे उदय सामंत यांनी सांगितले.

आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल

तसेच मंत्री गिरीश महाजन यांनीही खातेवाटपावरुन भाष्य केले. “खातेवाटपाबाबत महायुतीत कुठलीही नाराजी नाही. अजित पवार दिल्लीला गेले का? मला माहित नाही. लवकरंच खातेवाटप जाहीर होईल. अर्थखात्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. तर शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, असे सांगितले. “खातेवाटपाबाबत महायुतीत कुठलीही रस्सीखेच नाही. तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रीपद मिळालं होतं, आता त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. आम्ही तीन टर्म आमदार होतो, पण तेव्हा संधी मिळाली नाही. आता न मागता मंत्रीपद मिळालं”, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.