AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यावर अजून का शिफ्ट झाले नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्यामागचं कारण

Devendra Fadnavis : . "कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत" असा दावा काल संजय राऊत यांनी केला होता. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसोबतच नातं कसं आहे? त्या बद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या.

Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यावर अजून का शिफ्ट झाले नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्यामागचं कारण
devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Feb 05, 2025 | 1:09 PM
Share

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा फडणवीस यांना भेटले होते. या दोन भेटीनंतर भाजप आणि ठाकरे गट जवळ येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच नातं कसं आहे? त्या बद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या. “उद्धव ठाकरेंसोबत संबंध फार खराब अशी परिस्थिती नाही. पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी सुद्धा स्थिती नाही” असं सांगितलं.

लोकसत्ताच्या मुलाखतीत त्यांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सौहार्दाचे संबंध तयार होतायत अशी चर्चा आहे, ही कितपत खरी, कितपत खोटी, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस गमतीने म्हणाले इथे मिलिंद नार्वेकर बसलेत त्यांना माहिती असेल. “उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. त्या व्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. दक्षिण भारतात नेते ज्या प्रमाणे एकमेकांच्या जान के प्यासे तशी स्थिती महाराष्ट्रात नाही. संबंध खूप खराब आहेत, अशी स्थिती नाही. पण म्हणून आम्ही जवळ येतोय, त्यांना सोबत घेणार अशी काही स्थिती नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

वर्षावर अजून का शिफ्ट झाले नाही? त्यामागचं कारण सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला कधी जाणार? असा प्रश्न संजय राऊत यांच्याकडून सातत्याने विचारला जातोय. “कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत” असा दावा काल संजय राऊत यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुलीची 10 वी ची परिक्षा संपल्यावर वर्षावर रहायला जाणार आहे’ “शिंदेंनी वर्षा सोडल्यावर मला तिथे जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी-मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी १० व्या वर्गात आहे, 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरु होत आहे. ती म्हणाली परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होऊ. म्हणून मी काही शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यावर शिफ्ट होईन” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.