AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पूरस्थिती, कुठे ढगफुटी, तर कुठे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्रात पूरस्थिती, कुठे ढगफुटी, तर कुठे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती?
| Updated on: Aug 17, 2025 | 12:39 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईत संततधार पाऊस सुरु आहे. या संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत दमदार पावसाने नदी पात्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच कोकण आणि विदर्भात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र या सततच्या पावसामुळे काही पिकांना जीवनदान मिळाले आहे. जालना जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, आतापर्यंत ६९ टक्के पाऊस झाला आहे. विशेषतः बदनापूर आणि परतूर या दोन तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जळगावात ढगफुटीसदृश पाऊस, घरांमध्ये शिरले पाणी

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धरणी नाल्याला मोठा पूर आला आहे. सुरक्षा कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने जैन गल्ली आणि धरणी परिसरातील दुकाने व घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

कोकणात पावसाचा जोर कायम

कोकणातही पावसाचा जोर कायम आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. तसेच अनेक नद्यांनी धोक्याच्या पातळी गाठली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले असून, डीबीजे कॉलेजसमोरील रस्ते जलमय झाले आहेत. गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीचे पाणी बाजार पुलाला टेकले असून, प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नदी किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील गड नदीचे पाणी पुन्हा माखजन बाजारपेठेत शिरले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे आणि नदीकाठी दुकाने असल्यामुळे थोडे जरी पाऊस पडला तरी येथे पाणी भरते. सध्या १० ते १२ दुकानांमध्ये पाणी शिरले असून, दुकानदार सतर्क असल्याने मोठ्या नुकसानापासून बचाव झाला आहे.

धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धाराशिव, तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.

नांदेडच्या ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, गावे पुराच्या वेढ्यात

नांदेड जिल्ह्यातील ईसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात (४८,२०५ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. किनवट तालुक्यातील पिंपरी आणि भंडारवाडी ही दोन गावे पुराच्या वेढ्यात सापडली आहेत. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने, गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कामासाठी जावे लागेल, अशी व्यथा मांडली आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष