AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेत्यांनो कामाला लागा, राज्यातील महापालिका निवडणुका कधी? भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले महत्वाचे संकेत

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात वेग आला आहे. भाजपने मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत रणनीती ठरवली. आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात. युतीतील जागावाटप आणि समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

नेत्यांनो कामाला लागा, राज्यातील महापालिका निवडणुका कधी? भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले महत्वाचे संकेत
mumbai bmc
| Updated on: Dec 12, 2025 | 8:42 AM
Share

आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महानगरपालिका (BMC) आणि जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून, तयारीचा भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीवर सखोल चर्चा करण्यात आली.

या उच्चस्तरीय भेटीनंतर रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या चर्चेत प्रामुख्याने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कशा पद्धतीने पुढे जायचे आणि युतीत जागा वाटप आणि समन्वय कसा असावा, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या भेटीपूर्वी भाजपने आपल्या कोअर टीमची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. त्या बैठकीतील निष्कर्षांवर आधारित रणनीती आणि प्रस्तावित योजना शिंदे-फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आल्या. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष संघटनात्मक पातळीवर कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, यावरही चर्चा करण्यात आली.

महापालिकेची निवडणूक कधी होणार?

यावेळी रविंद्र चव्हाणांनी महापालिका निवडणुका कधी होतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होतील, याबद्दलचे संकेत दिले. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने सुरू झाली आहे. या प्रक्रियेला गती मिळाल्याने येत्या जानेवारी महिन्यात या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या तयारीसोबतच २० डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातही या बैठकीत अंतिम रणनीती निश्चित करण्यात आली आहे, असे रविंद्र चव्हाणांनी म्हटले.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

एकीकडे महापालिका निवडणुका लवकर घेण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रविंद्र चव्हाण यांनी यामागील कारण स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील आरक्षणाचा विषय सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षणाशी संबंधित हा कायदेशीर तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे, आरक्षणाच्या न्यायालयीन निर्णयावरच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. याचा अर्थ महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी केली.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.