Maharashtra News LIVE : मेट्रोसाठी 139 झाडांची होणार कत्तल, सातारा रस्त्यावरील मार्गिकेसाठी झाडांवर कुऱ्हाड
Maharashtra News LIVE : वृक्षप्रेमींचा संताप पुन्हा पाहायला मिळणार आहे, कारण मेट्रो 139 स्टेशनच्या कामासाठी 139 झाडांवर कुऱ्हाड चालवणार आहेत. तर जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन निर्णायक राहील,असं निर्धार देखील जाहीर केला... राज्यातील पावसाबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.

LIVE NEWS & UPDATES
-
अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेत अव्वल, वर्षभरात ३१.३५ कोटींचा महसूल; २.२९ लाख प्रवाशांनी घेतला लाभ
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्या पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्याच वर्षात प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ११ ऑगस्ट २०२५ ते २८ जुलै २०२६ दरम्यान तब्बल २.२९ लाख प्रवाशांनी या गाडीतून प्रवास करून रेल्वेला मोठा महसूल मिळवून दिला. वर्षभरात तब्बल ३१ कोटी ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक विक्रमी उत्पन्न जमा झाले असून, वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारी ही मध्य रेल्वेतील पहिली वंदे भारत ठरली आहे.
-
डोंबिवलीतील ‘मेला ऑर्केस्ट्रा बार’वर पोलिसांचा छापा; बार मालकासह ३३ जणांवर गुन्हा दाखल
डोंबिवलीतील ‘मेला ऑर्केस्ट्रा बार’वर पोलिसांनी छापा टाकला आहे. बार मालकासह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोकड्या कपड्यांतील अश्लील नृत्य, पैशांची उधळण सुरु असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ग्राहक, नृत्यांगना, व्यवस्थापक आणि सेवकांविरोधात गुन्हे दाखल करत ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-
-
डीपफेक व्हिडिओद्वारे महिलेची फसवणूक….
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या डीपफेक व्हिडिओ तयार करून फसवणुकीची घटना घडल्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला सायबर चोरट्यांनी बनावट व्हिडिओ तयार करून एका महिलेची चार लाख 9 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला याबाबत भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
पुण्यात चार दिवसांत हलक्या पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने उघडीत दिल्याने उकड्यात वाढ झाली आहे त्यामुळे पुणेकरांना दमट हवामानाचा त्रास सहन करावा लागत आहे पुढील दोन ते तीन दिवसांत शहरात दमदार पावसाची शक्यता नसून तुरळ ठिकाणी हलक्या ते अति हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
-
पुण्यातून विक्रमी २१९ विमान उड्डाणे, दोन अतिरिक्त विमानसेवांमुळे नवा उच्चांक
लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एकाच दिवसात तब्बल २१९ विमानांच्या उड्डाणांचे ऐतिहासिक नियोजन करण्यात आले, विमानांचे आगमन आणि प्रस्थान या दोन्ही आघाड्यांवरील सर्व उड्डाणे नियोजित वेळेनुसार यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे हा एक नवा उच्चांक ठरला आहे.
-
-
मंत्री बावनकुळे,एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकर मनोज जरांगे पाटलांची जोरदार टीका.
सांगली दौरयावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी नोंदी रद्द वरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे.तसेच मराठा बांधवांना २९ ऑगस्ट रोजी चलो अंतरवाली सराटीची हाक देत, हे आंदोलन निर्णायक राहील,असं निर्धार देखील जाहीर केला आहे.सांगलीच्या आटपाडी मध्ये पार पडलेले जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
-
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत 125 ते 130 नागरिकांना चावा, 11 वर्षीय मुलगी गंभीर जखमी
कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल ते खडकपाडा मार्गावर भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत निर्माण केली. दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 125 ते 130 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये 11 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. चावा घेतलेल्या नागरिकांमध्ये रुक्मिणीबाई यांचाही समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच भटक्या कुत्र्यामुळे शेकडो नागरिक जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सातारा रस्त्यावरील प्रस्तावित भूहारी मेट्रोमार्गीका स्टेशनच्या कामासाठी 139 झाडांवर कुऱ्हाड चालवणार आहेत यामध्ये अवघ्या चार वर्षाच्या झाडांपासून 70 वर्षे वयाच्या पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांचा समावेश आहे या झाडांच्या बदल्यात 3449 नवीन झाडे लावण्याचा अटीवर पालिकेने महा मेट्रोला झाडे हटवण्यासाठी जून मध्ये परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे सांगली दौरयावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी नोंदी रद्द वरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे.तसेच मराठा बांधवांना २९ ऑगस्ट रोजी चलो अंतरवाली सराटीची हाक देत,हे आंदोलन निर्णायक राहील,असं निर्धार देखील जाहीर केला आहे.धर्मांतराचं प्रकरण देखील समोर येत आहे. मीरा भाईंदरमध्ये धर्मांतराच्या संशयावरून दोन गटांत हाणामारी,गैरसमजातून प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाईंदर पश्चिमेला आयोजित एका प्रार्थना सभेत धर्मांतर होत असल्याच्या गैरसमजातून दोन गटांत जोरदार वाद आणि हाणामारी झाली. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.