Maharashtra News LIVE : अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे यांची आज दुपारी भेट
Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणावरून आता निर्णायक लढा सुरू करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. उद्या मुंबईतील मोर्चाविषयीची रुपरेषा ते मांडतील. दरम्यान अभिजीत दिपके आणि मनोज जरांगे याची आज दुपारी भेट होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
राज्यमंत्री योगेश कदम घेणार प्रथमेश देशमुख याच्या कुटुंबीयांची भेट घेणार
राज्यमंत्री योगेश कदम आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून प्रथमेश देशमुख याच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची राज्यमंत्री योगेश कदम आज 4 वाजता भेट घेणार आहेत. प्रथमेशच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांशी संवाद साधून घटनेची माहिती घेणार असून, कुटुंबीयांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेण्याची शक्यता आहे. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या प्रथमेश देशमुख याने दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली असून तो धाराशिवच्या परंडा तालुक्यातील रहिवासी आहे
-
Gondia Rain update : गोंदियात पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा
गोंदिया जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी दर्शवली आहे. या पावसामुळे उकड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाल आहे. धान पिकाला जीवनदान मिळालं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
-
-
धुळ्यातील चिमठाण्यात विद्यार्थ्यांचा एसटी बससेवेसाठी रास्ता रोको
धुळ्यातील शिंदखेडा आगाराची सकाळी ७ वाजताची बस दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे ६० ते ७० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; संतप्त विद्यार्थ्यांचा रास्ता रोको केला. सकाळी ६ वाजल्यापासून चिमठाणे बसस्थानकात आंदोलन सुरू आहे. बससेवा सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही – विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल दोन तास आंदोलन सुरू, मात्र एसटीचा एकही अधिकारी घटनास्थळी नाही
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे एसटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. -
गणेश उत्सवामध्ये भक्तांसाठी 50 कोटीचा विमा
दगडूशेठ गणपती ट्रस्ट कडून गणेश उत्सवामध्ये भक्तांसाठी 50 कोटीचा विमा काढण्यात आला आहे. गणेशोत्सवात भक्तांची होणारी गर्दी आणि त्यामध्ये काही दुर्दैवी प्रसंग घडला तर हा विमा देण्यात येतो. गणेशोत्सवाच्या काळात दगडूशेठ गणेश मंडळाच्या परिसरात चार एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत सुरक्षा कडेकोट व्यवस्था राहावी यासाठी देखाव्याच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत
सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेसोबत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अडीचशे पुरुष आणि महिला यांची खाजगी सुरक्षा व्यवस्था असणार आहे -
नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी पोलिसांवर संतापले
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडातील हल्द्वानी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीला भाजपकडून विरोध करण्यात आला होता. तसेच, ज्या ठिकाणी ही मिरवणूक काढण्यात आली होती, त्या ठिकाणाचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या प्रकाराविरोधात नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. अखेर गुन्हा दाखल करण्यासाठी खासदार गोवाल पाडवी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी २० खासदारांना पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, खासदार गोवाल पाडवी यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तब्बल चार तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. पोलीस ठाण्यात खासदार गोवाल पाडवी आक्रमक झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
-
धाराशिव च्या कसबे तडवळे येथे रात्री 12 वाजे दरम्यान मराठा आंदोलकांचा रास्ता रोको
लातूर-पुणे महामार्गावर तेरणा नदी पुलावर लाकडे पेटवून आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले. लातूर-पुणे मार्गावरील तेरणा नदी पुलावर लाकडे पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रात्री सुमारे दोन तास आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने लातूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
-
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल माफी पास
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल माफी पासच वितरण सुरू झाले आहे. पुणे आरटीओ कडून आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त व्यक्तींना टोलमाफीचे पास देण्यात आले आहे. टोल माफीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांनी वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील आळंदी रस्ता आणि दिवे येथील कार्यालयामध्ये हे पास उपलब्ध करून दिले आहेत भाविकांनी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करून लाभ घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यात १३४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’
नंदुरबार जिल्ह्यात १३४ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवली जात आहे. गणेशोत्सवातून सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात या संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. ग्रामीण भागासोबतच आता शहरी भागातही ‘एक वॉर्ड, एक गणपती’ संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एक गाव, एक गणपतीमुळे गावातील नागरिकांमध्ये एकोपा वाढणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
गणरायाच्या स्वागतासाठी फुलांचे भाव तेजीत
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरातील फुल बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे मंडपाची सजावट आरास हरामी पूजेसाठी आघाऊ तसेच किरकोळ बाजारात मुलांना मागणी वाढली आहेत बाजारात दाखल होणाऱ्या फुलांच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने झेंडू, शेवंती भावात 30 टक्क्यांनी वाढ झाली तर गुलछडी चे भाव दुप्पट झाले आहेत
-
जालन्यात बैलपोळा सणाचा उत्साह, सन्मान चिन्ह देऊन सत्कार
भाटेपूरी गावात पोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्कृष्ट सजवलेल्या बैलजोड्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाटेपूरी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण अत्यंत थाटामाटात आणि नेहमीपेक्षा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गावात आयोजित करण्यात आलेला विशेष सत्कार समारंभ. गावातील सर्व शेतकर्यांनी आपल्या बैलजोड्यांना विविध रंगीबेरंगी मोरप्या, बाशिंगे, झूल, घुंगुरमाळा आणि आकर्षक रंगांनी अत्यंत सुंदर रीतीने सजवले होते. या सजवलेल्या बैलजोड्यांमधून उत्कृष्ट आणि आकर्षक सजावट केलेल्या बैलजोड्यांची निवड करून त्यांच्या मालकांना सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
-
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौदावा दिवस, प्रकृती खालावल्याने उपचार सुरू
राष्ट्रवादीच्या आमदारांनी परवा रात्री केलेल्या चर्चेनंतर अद्याप कुठलेच उत्तर मिळाले नाही, गेल्या चार दिवसांपासून शिष्टमंडळाची चर्चा नाही. उद्या दुपारी 12 वाजता अंतरवालीत निर्णायक बैठक, आंदोलनाबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रकृती खालावल्याने रात्री उशिरापासुन पुन्हा उपचार सुरू करण्यात आले असुन वैद्यकीय पथकाकडून 24 तास लक्ष ठेवले जात आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या आठवडाभरापासून सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत फिरकलेले नाही. तर उद्या मुंबईतील धडकणाऱ्या मोर्चाविषयी जरांगे पाटील रुपरेषा मांडतील. दरम्यान आज कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके हे मनोज जरांगे पाटील यांची दुपारी भेट घेणार आहेत. भंडारा आणि महाप्रसादाविषयी अन्न आणि औषध प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एमपीएससी पेपरफुटीचा मुद्दा राज्यात पेटला आहे. अनेक शहरातील परीक्षार्थी, उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. तर एमपीएससीतील परीक्षांची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हवामान खात्यानुसार आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरीत राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाने ओढ दिल्यास मराठवाड्यावर जलसंकट आणि दुष्काळाचे सावटाची टांगती तलवार आहे.
तर दिल्लीत उद्यापासून BRICS शिखर परिषद होत आहे. या परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यासह इतर देशातील नेतृत्व भारतात येणार आहे. 12-13 सप्टेंबर दरम्यान ब्रिक्स परिषद होईल. भारत मंडपममध्ये होणाऱ्या या परिषदेत व्लादीमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, इराणचे राष्ट्रपती मसूज पेजेशकियन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचा सहभाग असेल. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस हे पण सहभागी होतील .