AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंसारखा धडाकेबाज अधिकारी, 2 कोटींचा अवॉर्ड जिंकणाऱ्या डीएम पांडेंना हटवलं

उत्तर प्रदेशात आयएएस आणि पीसीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जालौन आणि बहराइचसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंसारखा धडाकेबाज अधिकारी, 2 कोटींचा अवॉर्ड जिंकणाऱ्या डीएम पांडेंना हटवलं
योगी आदित्यनाथ, राजेश कुमार पांडेImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2026 | 9:27 AM
Share

उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी रात्री उशिरा मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. राज्यातील 5 आयएएस आणि 6 पीसीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात बहराइच आणि जालौन या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. प्रशासनातील कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. या बदल्यांमध्ये IAS अधिकारी राजेश कुमार पांडेय यांची बहराइचच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी जालौनचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. बहराइचचे विद्यमान जिल्हाधिकारी अक्षय त्रिपाठी यांची केंद्र सरकारमध्ये नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होतं. आता राजेश कुमार पांडेय यांच्याकडे बहराइचची जबाबदारी देण्यात आली आहे.

समीर यांच्याकडे जालौनची जबाबदारी

राजेश पांडेय यांच्या बदलीनंतर IAS अधिकारी समीर यांची जालौनच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समीर हे यापूर्वी माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विशेष सचिव तसंच यूपीडेस्कोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे जालौन जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय झांसी नगर निगमच्या आयुक्त आकांक्षा राणा यांची माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विशेष सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर मुरादाबाद विकास प्राधिकरणाचे सचिव पंकज वर्मा यांची बाराबंकीच्या मुख्य विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

6 PCS अधिकाऱ्यांच्याही बदल्या

IAS अधिकाऱ्यांसोबतच उत्तर प्रदेशातील सहा PCS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. सुशील प्रताप सिंह यांची लखनऊ विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी भारतखंडे संस्कृती विद्यापीठाचे कुलसचिव आणि संस्कृती संचालनालयाचे अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, अतुल कुमार यांच्याकडे भारतखंडे संस्कृती विद्यापीठाचे नवे कुलसचिव तसेच संस्कृती संचालनालयाच्या अतिरिक्त संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बदायूंमधील उपजिल्हाधिकारी राजेश कुमार सिंह यांची कानपूर नगरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

तसेच गोंडाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुमार सिंह यांची युवा कल्याण आणि प्रांतीय रक्षक दलाच्या उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे. कुशीनगरचे उपजिल्हाधिकारी योगेश्वर सिंह यांची झांसीच्या नगर दंडाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे आगामी काळात संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन