Maharshtra News LIVE : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती
Maharashtra News LIVE Updates : आज मुंबईतील मद्रासवाडी सबवे ते वरळी प्रोमेनेड दरम्यान ‘महा वॉकेथॉन' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरातील काटोल नाका चौकातील खड्डा पोलिसांनी बुजवला.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत घटनास्थळी उपलब्ध साहित्याच्या मदतीने खड्डा बुजवला. पोलिसांच्या या तत्परतेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अद्यापही खड्ड्यांची समस्या कायम आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी खड्डा बुजवल्याने प्रशासनाच्या कामातील दिरंगाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
-
विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा
विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी विराट मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही केले इन्स्टॉल. मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होणार असल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती. दहा वाजता छत्रपती क्रीडा संकुलापासून मोर्चाला होणार सुरुवात.
-
-
पावसाचा खंड वाढल्याने पिक संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड
कपाशीच्या पिकाला डब्याने पाणी देत पीक संरक्षित करण्याचे प्रयत्न. १५ ते २० दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांना पाण्याचा ताण. दुपारच्या उन्हात कपाशीच पिक टाकते मान. शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्न. शेतात ड्रम मध्ये पाणी भरून डब्याच्या साहाय्याने पिकांना पाणी
-
कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली आणि कुपवाड बंद
सांगलीच्या कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली आणि कुपवाड बंद ठेवण्यात आले आहे. तर सकल हिंदू समाजाचा वतीने 4 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यासाहित सकल हिंदू कार्यकर्ते उपस्थिती राहणार आहेत.
-
जळगावच्या रावेर तालुक्यातील धुरखेड्यातील ३५ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी…
१५ दिवसांत मोजणी प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकाऱ्यांचे निर्देश. आठ दिवसापासून 35 कुटुंबाचे जळगावातील शिवतीर्थ मैदानावर सुरू होते आमरण उपोषण. जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चेनंतर मोजणी प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे
-
-
पुण्यात भाजपा दादा गट NCP चा वाद
दोन्ही नगरसेवकांचा विकासनिधी शुन्यावर अमोल बालवडकर आणि सुनील टिंगरे यांच्या प्रभागाला विकास निधी शून्य करण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार
-
कर्जमुक्ती साठी पात्र, मात्र मयत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले
कर्जमुक्ती साठी पात्र, मात्र मयत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले आहेत, ज्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मयत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा अडथळा, यादीतील शेतकरी मयत असल्याने अनेक कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहेत. मयत कर्जदारांच्या वारसांची बँकेत नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी बँकांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
नागपुरात भर पावसाळ्यात तापमानाचा पारा वाढला, रोज ढगाळ वातावरण मात्र तापमानात वाढ
नागपुरात भर पावसाळ्यात तापमानाचा पारा वाढला, रोज ढगाळ वातावरण मात्र तापमानात वाढ होत आहे. तापमानाचा पारा 32.2 अंश सेल्सिअस वर गेला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या 24 तासात 3.8 अंश सेल्सिअसने पारा वाढला आहे, हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होते. गेल्या दोन आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे. पुढील सात ते आठ दिवस पावसाची श्यक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
-
अमरावतीत आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरण
15 ऑगस्टच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने व महर्षी शाळेच्या हलगर्जीपणामुळे राजेश बेठेकर या आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर पाच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले… यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून महर्षी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. महर्षी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून महर्षी शाळेच्या हलगर्जीपणा समोर आला.
-
अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच…
अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच आहे. शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रात्र उघड्यावरच जागून काढली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. अमरावती मधील महर्षी शाळेत अकरावी मध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्यांचा मृत्यूप्रकरणी महर्षी शाळा प्रशासनावर सदोषमनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे..
-
दहिसर – गांजा शेती पर्दाफाश – अल्पवयीनाकडून महिलेवर चाकू हल्ला
मुंबईच्या दहिसरमध्ये गांजा शेतीचा पर्दाफाश करणाऱ्या अल्पवयीन मुलाला धमकावणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बोरीवली MHB पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक 4 मध्ये रात्री 9 च्या सुमारास सुमन ठाकूर या महिलेवर एका अल्पवयीनाने चाकूने वार केले. काही दिवसांपूर्वी या परिसरात घरात गांजा शेतीचा प्रकार उघड झाला होता. त्याच प्रकरणाशी संबंधित असल्याने महिलेने अल्पवयीनाला धमकावले होते. रागाच्या भरात अल्पवयीनाने हल्ला केला आणि स्वतःचा व्हिडिओ बनवून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर : आयटी पार्कमागे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथील आयटी पार्कमागे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक मारली. दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. निखिल आणि कपिल आरके या भावांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. बीडचे रहिवासी असलेले दोन्ही भाऊ कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वी संभाजीनगरात आले होते. कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी सिडको पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती देत झाडांबाबतची माहिती सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे. वृक्षतोड प्रकरणावरील याचिकेची सुनावणी 8 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त अमरावतीत महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाविद्यातुन या रॅलीचा प्रारंभ होणार आहे. पाण्याचे महत्त्व, जलसंधारण, मृदू संधारण, तसेच भविष्यातील पाणी सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईतील मद्रासवाडी सबवे ते वरळी प्रोमेनेड दरम्यान ‘महा वॉकेथॉन 2026 – Walk for Water’ आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.