
अहिल्यानगर जिल्ह्यातील 40 गावांना अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर , राहता , संगमनेर , अकोले , राहुरी , नेवासा ,भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे गहू , टोमॅटो , मका , कांदा पिकांचे मोठ नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 40 गावांना वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं शेती पिकांचे उत्पादन संपुर्णत: नष्ट झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
सोलापुरात घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्तात गॅसचे वितरण सुरू करण्यात आले आहे. सोलापुरातील कुमठा नाका परिसरात गॅस सिलेंडरसाठी लागली अर्धा किलोमीटर रांगा लागल्या आहेत. आधी नोटबंदी नंतर कोव्हीड लस आणि आता गॅससाठी जनता रांगेत थांबलीय. आम्हाला सबसिडी जमा झाल्याचा मॅसेज येतो मात्र आम्हाला टाकी मिळत नाही. त्यामुळे आमच्या हक्काची गॅस टाकी दुसऱ्याला दिली जातेय आणि काळा बाजार केला जातोय.
गडचिरोलीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माओवाद्यांना दिलेली ३१ मार्चची डेडलाईन जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी हे वक्तव्य केले. गडचिरोलीसह तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की बंदुकीच्या जोरावर क्रांती करण्याचे स्वप्न कधीही साकार होणार नाही. राज्य सरकारच्या विविध पुनर्वसन योजनांचा लाभ घेऊन नक्षलवाद्यांनी सन्मानाने जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे कलिंगड, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल सायंकाळपासून अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. तसेच गारपीट आणि पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान पाहायला मिळत आहे. पीक काढणीला आलेली असताना झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात निसर्गाच्या कोपाने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी, वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तीन एकर द्राक्षबाग पूर्णपणे भुईसपाट झाली असून, बेदाणा रॅकवरील मालासह त्यांचे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असतानाच हे अस्मानी संकट ओढवल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका गहू, बाजरी, ज्वारी आणि फळबागांना बसला असून काढणीला आलेला गहू पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान सोसल्यानंतर, आता सततच्या पावसामुळे आगामी खरीप हंगामही धोक्यात आला असून मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.
सोलापूरकरांसाठी इंधन दराबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शहरात सध्या साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून, केवळ ‘स्पीड’ पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे साध्या पेट्रोलचा दर 104 रुपये प्रति लिटरवर कायम असला, तरी स्पीड पेट्रोल आता 111 रुपयांवरून 113 रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बीडच्या केज तालुक्यातील डोंगर पट्ट्यामध्ये झालेल्या गारपीटीचे विदारक दृश्य समोर आले आहे. बीडच्या कोरडेवाडी, तुकुचीवाडी आणि घाटेवाडी भागात काल झालेल्या गारपीटी नंतर तब्बल दोन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या गारपीटीमुळे गहू, ज्वारी आंबा, आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास गेला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.
नांदेड जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय,काल सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह गारपिटीमुळे अर्धापुर तालुक्यातील चाभरा, सोनाळा,खैरगाव,लिंबगाव भागातील शेतीतील केळी,हळद,गहू,ज्वारी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय, सोनाळा येथील काशिनाथ देबगुंडे यांच्या शेतातील 2 एक्कर ज्वारी भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यातील काही ठिकाणी तीन दिवसा पासूनच वादड वारा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यावर्षी आंब्याचे उत्पन्न जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात होईल असे दिसून येत होते परंतु अचानक आलेल्या वादळंमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा मका व महफूल सारख्या पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी. पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक. अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैध कब्जा. ओझर परिसरात काही बांधकाम व्यवसायिकांसोबत भागीदारी, गेल्या आठवड्यात केले होते इमारतीच भूमिपूजन
खरात याच्या घरातून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काढतोस पोलिसांनी केले होते काल जप्त. भोंदू खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का ? पिस्तूल कोणाकडून कसे केव्हा कधी मिळवले याचा पोलिसांकडून शोध सुरू. पिस्तूल चा वापर धमकवण्यासाठी करायचा का असा देखील प्रश्न उपस्थित
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मध्यरात्री वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडला .. तर चिखली, लोणार तालुक्यात गारपीट झाली असून शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे .. यामधे कांदा, गहू, हरभरा, आंबा, सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे ..
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द गावात शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे अतोनात नुकसान झालं. ऐन हंगामात रब्बी हंगामातील पीक जोमात असताना अवकाळी पावसाने दणका दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले. सरकारने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली.
धाराशिव जिल्ह्याला सलग तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपले आहे. वेगाचा वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने धाराशिव मध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आहे. त्यामध्येच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने केळीची झाडे अक्षरशा मोडून पडली आहेत. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत
भोंदू अशोक खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. या भोंदूने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केली आहे. पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याने अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैध कब्जा केला आहे. ओझर परिसरात काही बांधकाम व्यवसायिकांसोबत भागीदारी, गेल्या आठवड्यात केले होते इमारतीच भूमिपूजन केले आहे.
राहाता तालुक्यातील अनेक भागाच गारपीट आणि वादळी वा-यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू , हरबरा , मका यासह द्राक्ष आणि डाळींब उत्पादनाला फटका बसला आहे. काही ठिकाणी मका भुईसपाट तर गहू पिकांचे देखील नुकसान झाले आहे. फळधारणा सुरू झाली असताना गारा आणि वादळी वा-यामुळे फळे गळून पडली आहे. एकरी शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यातील सादतपूर येथील प्रगतशिल शेतकरी दादासाहेब मगर यांच्या डाळींबाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शिरुर तालुक्यातील मलठण परिसरात गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झालेय काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.पावसामुळे गव्हाचे उभे पीक पूर्णपणे भिजून गेले असून हार्वेस्टर मशीनने काढणी करणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर लावून भिजलेला गहू कापून वाळवण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा आणि भाजीपाला पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी पुन्हा चंद्रपुरात येईन, असे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल असे म्हटले होते, त्याच पद्धतीने मी पुन्हा चंद्रपुरात येईन ,विकासाचा झंझावात करेन असे भाष्य केले.
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मका, ज्वारी, बाजरी, गहू आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिकचा भोंदू अशोक खरात ऊर्फ कॅप्टन याचे कारनामे समोर आले आहे. तर अजून अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत. त्याची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर यानिमित्ताने रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर असा सामना पुन्हा रंगला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदू खराची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर आज रुपाली ठोंबरे यांची फेसबूक पोस्ट चर्चेत आली आहे. रुपाली चाकणकर फरार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर राज्यात अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर गावरान अंब्यांचा मोहर झडण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या झळा अजूनही नागरिकांना सहन कराव्या लागत आहे. गॅस दरवाढीनंतर राज्यात खाद्यतेलाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. यासह राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.