Maharashtra News LIVE : निवडणूक बिनविरोध करावी असा काँग्रेसला सल्ला देईन – शरद पवार
Maharashtra News LIVE Updates : आज तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्याशिवाय अशोक खरातसह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोड राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगाव – पारोळ्यात शासकीय गोदामात शासकीय भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना टोकनचे वाटप
जळगावच्या पारोळ्यात शासकीय गोदामात शासकीय भरडधान्य खरेदीसाठी १ हजार ७५० शेतकऱ्यांना टोकनचे वाटप करण्यात आलं. नोंदणीसाठी चार दिवसांपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता. प्रचंड गर्दी झाल्याने वादविवाद आणि किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या.
मात्र शेतकऱ्यांनी रांगा लावल्यानंतर पोलिस बंदोबस्तात दोन स्वतंत्र ठिकाणांहून शेतकऱ्यांची नोंदणी करून टोकन वाटप करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाने 1 मे पासून प्रत्यक्ष खरेदीला परवानगी दिली असून 30जूनपर्यंत खरेदीची ही प्रक्रिया चालणार
-
बारामती पोटनिवडणुकीबाबात राष्ट्रवादीची सावध भूमिका
बारामती पोटनिवडणुकीबाबात राष्ट्रवादीची सावध भूमिका, या निवडणुकीसंदर्भात कोणीही आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये. काँग्रेसचं मन दुखावेल असं कोणीही बोलू नये, असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारी 3 पर्यंत माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी अशा सूचनाही पक्षाच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.
-
-
नशिक – भोंदू अशोक खरातची आज तिसऱ्या गुन्ह्यात महत्त्वाची सुनावणी
नाशिक – भोंदू अशोक खरातची आज तिसऱ्या गुन्ह्यात महत्त्वाची सुनावणी आहे. काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर SIT ने पुन्हा ताबा घेतला . आज वैद्यकीय तपासणीनंतर व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करणार आहेत.
गर्भवती महिलेवर अत्याचार प्रकरणी सुनावणी होणार असून पोलीस कोठडीसाठी SIT जोरदार युक्तिवाद करणार आहे. पुढील तपासासाठी कोठडीची गरज असल्याचं कारण मांडण्यात येणार असून खरातला पुन्हा किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
मुंबईच्या अक्सा चौपाटीवर जीवरक्षकांनी वाचवले चार मुलांचे प्राण
मुंबईतील मालाड येथील आक्सा चौपाटीवर आज सकाळी एका मोठ्या दुर्घटनेची टाळता आली. सकाळी साडेसहा वाजता चार मुले चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. खेळ संपल्यानंतर ही मुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली, मात्र ओहोटीचा काळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती बुडू लागली. सकाळी ८:०५ च्या सुमारास ‘दृष्टी लाईफ सेविंग’च्या जीवरक्षकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी जवळच मासेमारी करणाऱ्या ‘साई राम’ बोटीवरील मच्छिमारांनीही आपले काम सोडून मदतीसाठी बोट पुढे आणली. जीवरक्षक आणि मासेमारी बोटीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे चारही मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नथुराम सूर्यवंशी, भावेश तांडेल, मन वैती, प्रीतम म्हात्रे आणि हार्दिक म्हात्रे या जीवरक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय पेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत १८ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक असून ५ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी दोन अपक्ष अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे, तर महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने पेच वाढला आहे. भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले रिंगणात असून, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा राहुरी दौरा असल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे.
-
-
बीडमधील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन, कारला भीषण अपघात
बीड जिल्हयातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी भीषण कार अपघातात दुःखद निधन झाले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश गिड्डे हे एक तरुण आणि अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित होते, तसेच सामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या जवळीकीमुळे त्यांनी अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच महसूल विभागासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सध्या त्यांचा मृतदेह रेणापूर येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
-
१५ मार्चपासून ५ एप्रिलपर्यंत कुणीही संपर्क साधला नाही – हर्षवर्धन सपकाळ
आमच्या अटीशर्थी चुकीच्या नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करु का देत नाहीत, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे लढाई, असं हिंसक वळण देण्यात आले आहे. १५ मार्चपासून ५ एप्रिलपर्यंत कुणीही संपर्क साधला नाही, सुनेत्रा पवारांनी फोन करुन अर्ज मागे घेण्याची विनंती केली, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
-
धुळ्यात मिरचीची आवक घटली, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे किलोमागे १५० रुपयांची वाढ
धुळे बाजारपेठेत सध्या सुकविलेल्या मिरच्यांना मोठी मागणी असली, तरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात मिरचीची आवक घटल्याने दरात प्रति किलो १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत गावरानी, लाल मिरची, चपाटा, रसगुल्ला आणि काश्मिरी मिरचीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. गुणवत्ता आणि प्रकारानुसार मिरचीला २०० रुपयांपासून ते ५५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हक्काची आवक कमी झाल्याने मिरचीचे दर कडाडले असून, ऐन हंगामात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे.
-
दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला विलंब? कालावधी आणखी वाढणार
दादर येथील इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला तांत्रिक कारणांमुळे विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारने २०२६ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता हा कालावधी वाढण्याची चिन्हे आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे या आठवड्यात एका शिष्टमंडळासह नोएडा येथे जाऊन पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. सुमारे ३५० फूट उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक असून, सध्या येथे पायाभूत सुविधा आणि परिसर विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सरकारने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली असली, तरी काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामाची गती मंदावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील फोटो समोर
याच कंपनीतील एका तरुणाला संशयित आरोपी त्यांनी धर्मांतर करायला लावण्याचा आरोप. संशयित तैसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार. कंपनीतील हिंदू तरुणाला दुपारच्या वेळेस नमाज पठण करायला लावली जात असल्याचा आरोप. याशिवाय हिंदू तरुणाला बिप मटन खाऊ घातल्याचाही फिर्यादीत उल्लेख
-
सिल्लोड आगाराच्या वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. सिल्लोड डेपो मॅनेजर तिघां विरोधात आत्महत्या प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कारवाईच्या मागणीसाठी सहकारी कर्मचारी आक्रमक
-
मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात १७ टक्क्यांची घट…
मुंबई शहरासाठी दिलासादायक बातमी… मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात १७ टक्क्यांची घट. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी घटले असून, मागील ३ वर्षांतील ही सर्वात स्वच्छ हवा मानली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, धूळकण (PM2.5 आणि PM10) पातळीमध्ये घट झाल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे. यामागे बांधकामांवर नियंत्रण, रस्ते स्वच्छता मोहीम आणि औद्योगिक उत्सर्जनावर कडक कारवाई यांचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
-
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्य नियोजन विभागाकडे धाव. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा शिवसेन ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश, अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला यापूर्वी वादामुळे मिळाली होती स्थगिती. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी पेक्षा जास्त निधीची मान्यता, समितीची मान्यता न घेताच निधीची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा कैलास पाटलांचा आरोप
-
युद्धविराम पुन्हा धोक्याच्या स्थितीत..
अमेरिका आणि इराणकडून युद्धविराम जाहीर करण्यात आले. पण तीन अटींचे उल्लंघन झाल्याचे इराणने म्हटले. त्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा जग संकटात आले.
-
पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली – रोहित पवार
पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये थोडी नाराजी. अजितदादांना न्याय द्या असा काँग्रेसने संदेश दिला. भेटी दरम्यान रोहित पवारांचा चेन्नीथलांसोबत संवाद. ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत.
-
रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट
रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बंद दाराआड केली चर्चा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी चर्चा. काँग्रेसने आकाश मोरे यांनी दिलीय उमेदवारी.
-
मुंबई शहरासाठी दिलासादायक बातमी
मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली. प्रदूषणात 17 टक्क्यांची घट. 2026 च्या पहिल्या तिमाहीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे 17 टक्क्यांनी घटले असून, मागील तीन वर्षातील ही सर्वात स्वच्छ हवा मानली जात आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, धूळकण (PM2.5 आणि PM10) पातळीमध्ये घट झाल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे.
-
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्य नियोजन विभागाकडे धाव. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश. अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला यापूर्वी वादामुळे मिळाली होती स्थगिती. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी पेक्षा जास्त निधीची मान्यता, समितीची मान्यता न घेताच निधीची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा कैलास पाटलांचा आरोप.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणी चौदावा गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरात प्रकरणी चौदावा गुन्हा दाखल. सिन्नर मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याचा अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल. माळी बंधूंकडून कवडीमोल भावात घेतली कोट्यवधी रुपयांची जमीन. तुम्ही जमीन विकली नाही तर 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी दिली धमकी. माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातने केली हडप. याच जमिनीवर नंतर त्याने उभारले ईशानेश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस.सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू.
-
आज तीन राज्यात विधानसभा निवडणुका, मतदानाला सुरुवात
केरळ, असम आणि पुडुचेरी या तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल.
भारतातील तीन राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. केरळ, असम आणि पुडुचेरी. केरळमध्ये विधानसभेच्या 140, असममध्ये 126 आणि पुडुचेरीमध्ये 30 जागा आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल. पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात एमएनजीएल कंपनीच्या पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) लाईनची गळती होऊन झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.