AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार; तर काँग्रेसचे 5 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले, महायुतीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

उद्धव ठाकरे गटाचे ४ आमदार आणि ३ खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले. तर काँग्रेसचे 5 आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार; तर काँग्रेसचे 5 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले, महायुतीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
| Updated on: Jan 21, 2025 | 9:23 PM
Share

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडीला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडीती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. त्यातच आता उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे.

उदय सामंत हे सध्या दावोसमध्ये आहे. यावेळी त्यांनी दावोसमधून दोन मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत काय म्हणाले?

तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाचे ४ आमदार आणि ३ खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले. तर काँग्रेसचे 5 आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

येत्या तीन महिन्यांत उद्धव ठाकरे गटाचे 10 माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख हे शिंदे गटात प्रवेश करतील. तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारीही लवकरच शिवसेनेत सामील होतील, असा दावा उदय सामंत यांनी केला.

राहुल शेवाळेंकडूनही दावा

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संर्पकात असून, ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 23 तारखेला नेमकं काय घडणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.