AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात अक्षरश: थैमान, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, नागरिकांनो काळजी घ्या

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. विशेष म्हणजे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच प्रशासनही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्व काळजी घेत आहे.

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात अक्षरश: थैमान, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, नागरिकांनो काळजी घ्या
Rain
| Updated on: Sep 01, 2024 | 4:58 PM
Share

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासासांठी मराठवडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा हा धुमाकूळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही असण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर उद्याही कायम असण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता 4 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे छोटे-मोठे ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. विशेष म्हणजे लातूरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणखी जोराने पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान होत आहे. अनेक शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर, अहमदपूर, रेणापूर, चाकुर, निलंगा भागात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस

नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. दुपारी एकच्या नंतर हवामान खात्याने नांदेड जिल्हा रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. जिल्ह्यातील 26 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीसह इतर छोटे-मोठे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. पण आज झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आलं आहे. अनेक भागात शेतामध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे. जिल्ह्यातील ६३मंडळांपैकी २६ मंडळांमध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. किनवट, हिमायतनगर, हदगाव, भोकर, मुदखेड आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात नदी-नाल्यांना मोठा पूर

अति मुसळधार पावसानं जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. मानोरा ते कारंजा रस्ता दापुरा जवळच्या नाल्याला आलेल्या मोठ्या पुराने बंद झाला आहे. तसेच इंझोरी गावाजवळील नाल्याला मोठा पूर आल्यानं इंझोरी-जामदरा रस्ता बंद झाला आहे. शेतात गेलेले शेतकरी अडकल्यानं त्यांचे हाल होत आहेत. तर मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी बोरव्हा परिसरातील नाल्यानाही मोठा पूर आला आहे. पोहरादेवी शिवारामधील शेतात पाणी घुसल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.

बीडमध्येबी मुसळधार पाऊस

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नागापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आबे. संततधार पावसामुळे परळी शहरासह 15 गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पाणी वाण नदीपत्रात सोडल्यामुळे नदीचे पाणीही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

परभणीत नागरी वस्तीत शिरलं पावसाचं पाणी

परभणीत पावसाचा जोर कायम आहे. परभणीत कालपासून 65 ते 70 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. हळूहळू पाणी आता सखल भागात असलेल्या नागरी वस्त्यात शिरत आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी घरात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर अतिवृष्टी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हिंगोली पावसाचा हाहा:कार

हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंगोली शहरातील बांगर नगर परिसरात असलेल्या मॉलमध्ये शटर तोडून पाणी आत मॉलमध्ये शिरलं आहे. मॉलमध्ये आत्ताही डोक्याच्या वर पाणी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. पत्त्याप्रमाणे मॉलमधील किराणा, फ्रीज काउंटर, असं साहित्य वाहून गेल्याचंही व्यापाऱ्यांनी tv9 मराठी शी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस

जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या कडकडाटांसह मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उष्णतेपासून हैरान झालेल्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे

यवतमाळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला आहे. पुरामुळे नाल्याने रौद्र रूप धारण केले होते. या पुरात या भागातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरात पुराचे पाणी सुद्धा शिरले होते. यावेळी नाल्या लगतच्या एका घरात पाणी शिरले. या घरातील 3 जण या पुरात अडकले होते. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी तात्काळ यंत्रणा बोलवून अडकलेल्या तीनही जणांना रेस्क्यू करुन वाचवले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.