AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा

हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनि देव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर शनि देव प्रसन्न झाले तर रंकालाही राजा बनवतात, मात्र शनि देव नाराज असतील तर तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं. आज आपण शनिदोषाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 10:08 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनि देव हे कर्म फळ दाता आहेत, म्हणजेच ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीचे कर्म हे चांगले असतील तर त्याला नक्कीच चांगलं फळ शनि देव देतात, मात्र जर एखाद्या व्यक्तीचं कर्म हे वाईट असेल, तर त्याच्यामागे शनि पिडा लागते असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला शनिदोष असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, मात्र वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही शनिदोष दूर करू शकता, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीन कधी शनिची साडेसाती ही येतेच, अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जर शनि देव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाले तर रंकाचाही राजा होतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या शनिवारच्या दिवशी खरेदी करू नयेत, त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

लोखंड – वास्तुशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी कधीही लोखंड खरेदी करू नये, यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. शनिदेव नाराज होतात. काहीही कारण नसताना घरात वादविवाद होतात, भांडणं होतात. त्यामुळे शनिवारच्या दिवशी कधीही लोखंड खरेदी करू नये असं वास्तुशास्त्र सांगतं, मात्र तुम्ही शनिवारी लोखंड दान देऊ शकता. त्यामुळे शनि देव प्रसन्न होतात.

मीठ- लोखंडाप्रमाणेच शनिवारी कधीही मीठ खरेदी करू नका, जर तुम्ही शनिवारी मीठ खरेदी केलं तर घरात शनिदोष निर्माण होतो. शनि देव नाराज होतात. यामुळे घराची आर्थिक स्थिरता नष्ट होते, घरावर कर्जाचा भार वाढतो, त्यामुळे कधीही शनिवारी मीठ खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. शनिवारी मीठ खरेदी करू नये, मात्र ते तुम्ही दान करू शकता, जर तुम्ही शनिवारी मीठ दान केलं तर शनि देव प्रसन्न होतात, तुमची शनि दोषातून सुटका होते. ज्यांना शनिची साडेसाती सुरू आहे, किंवा घरात शनिदोष निर्माण झाला आहे, अशा व्यक्तींनी दर शनिवारी शनि देवाची पूजा केल्यास तसेच शनि देवांना तेल अर्पण केल्यास शनिदोष दूर होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा.
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग....
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग.....
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM..
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM...
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.