AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा

हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनि देव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर शनि देव प्रसन्न झाले तर रंकालाही राजा बनवतात, मात्र शनि देव नाराज असतील तर तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं. आज आपण शनिदोषाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : शनिवारी या चुका टाळाच, अन्यथा शनिदोष निर्माण झालाच म्हणून समजा
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 10:08 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनि देव हे कर्म फळ दाता आहेत, म्हणजेच ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीचे कर्म हे चांगले असतील तर त्याला नक्कीच चांगलं फळ शनि देव देतात, मात्र जर एखाद्या व्यक्तीचं कर्म हे वाईट असेल, तर त्याच्यामागे शनि पिडा लागते असं धर्मशास्त्रात म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला शनिदोष असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, मात्र वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही शनिदोष दूर करू शकता, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीन कधी शनिची साडेसाती ही येतेच, अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. जर शनि देव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाले तर रंकाचाही राजा होतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या शनिवारच्या दिवशी खरेदी करू नयेत, त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

लोखंड – वास्तुशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी कधीही लोखंड खरेदी करू नये, यामुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. शनिदेव नाराज होतात. काहीही कारण नसताना घरात वादविवाद होतात, भांडणं होतात. त्यामुळे शनिवारच्या दिवशी कधीही लोखंड खरेदी करू नये असं वास्तुशास्त्र सांगतं, मात्र तुम्ही शनिवारी लोखंड दान देऊ शकता. त्यामुळे शनि देव प्रसन्न होतात.

मीठ- लोखंडाप्रमाणेच शनिवारी कधीही मीठ खरेदी करू नका, जर तुम्ही शनिवारी मीठ खरेदी केलं तर घरात शनिदोष निर्माण होतो. शनि देव नाराज होतात. यामुळे घराची आर्थिक स्थिरता नष्ट होते, घरावर कर्जाचा भार वाढतो, त्यामुळे कधीही शनिवारी मीठ खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. शनिवारी मीठ खरेदी करू नये, मात्र ते तुम्ही दान करू शकता, जर तुम्ही शनिवारी मीठ दान केलं तर शनि देव प्रसन्न होतात, तुमची शनि दोषातून सुटका होते. ज्यांना शनिची साडेसाती सुरू आहे, किंवा घरात शनिदोष निर्माण झाला आहे, अशा व्यक्तींनी दर शनिवारी शनि देवाची पूजा केल्यास तसेच शनि देवांना तेल अर्पण केल्यास शनिदोष दूर होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.