AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Updates : राज्यावर मोठं संकट! पुढचे 72 तास अलर्ट, 1 ते 4 घरीच थांबा, हवामान विभागाचा इशारा काय?

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडल्यानंतर आता उष्णतेची लाट आली आहे. 13 एप्रिलपासून महाराष्ट्रात 72 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शक्य तितकावेळ घरातच रहा.

Maharashtra Weather Updates : राज्यावर मोठं संकट! पुढचे 72 तास अलर्ट, 1 ते 4 घरीच थांबा, हवामान विभागाचा इशारा काय?
Heat WaveImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 13, 2026 | 7:23 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता उष्णतेचा पारा चढला आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेची इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानामुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील 72 तास नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे सल्ला देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कसे आहे.

कोकण विभागात आज हवामान कोरडे राहणार असले तरी समुद्रकिनारी भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषत: दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास जास्त जाणवू शकतो.

या राज्यांना येलो अलर्ट

मध्य महाराष्ट्रात मात्र उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी हलका गारवा जाणवला तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढेल. या भागात कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तासांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईचे हवामान

एखाद्या ठिकाणची भौगोलिक स्थिती तेथील हवामान कसे असेल हे ठरवते. मुंबईची भौगोलिक स्थिती बोलायची झाली तर ती १९.०७६ डिग्री अक्षांश आणि ७२.८७७७ डिग्री देशांतरावर येते. मुंबईच्या हवामानाबाबात (Mumbai Weather) बोलायचे झाले तर आज १३ एप्रिल २०२६ रोजी तापमान २८ डिग्री नोंदवले गेले आहे. कमाल तापमान ३० डिग्री आणि किमान तापमान २८ डिग्रीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सूर्योदयाचा वेळ सकाळी ०६:२२ AM आहे, तर सूर्यास्त संध्याकाळी ०६:५४ PM वाजता होईल. आर्द्रतेचे प्रमाण ५७% आहे, तर वातावरणातील दाब १०११ च्या पातळीवर आहे.

आता पुढील ७ दिवसांच्या साप्ताहिक हवामान अंदाजाचा (Weekly Weather Forecast) विषय जाणून घेऊया. आज आणि पुढील ६ दिवसांचे कमाल तापमान अनुक्रमे ३०, ३३, ३२, ३१, ३२, ३३, ३२ डिग्री राहण्याची शक्यता आहे.

या माहितीमधून आज मुंबईचे हवामान कसे राहील याचा अंदाज लावणे सोपे आहे. तसेच, शहराच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आजच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा (Air Quality Index) स्तर १५४ आहे. AQI चा हा स्तर ‘Poor’ श्रेणीत येतो. येथे PM 2.5 चे स्तर १५४ आहे, तर PM 10 चे स्तर १३३ आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर आपल्याला हे ठरवण्यास मदत करतो की बाहेर पडताना किती काळजी घ्यावी. जर हवा खराब असेल तर गरज पडल्यासच बाहेर पडणे आणि मास्क घालणे यासारखे उपाय केले जातात.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.