AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तर…, शरद पवारांच्या खास माणसाचं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तर..., शरद पवारांच्या खास माणसाचं मोठं वक्तव्य
| Updated on: Nov 11, 2024 | 3:19 PM
Share

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यापाचं राजकारण रंगताना दिसत आहे. सध्या महायुतीच्या नेत्यांकडून ‘एक है तो सेफ है’ ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावर जोर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र  बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

‘एक है तो सेफ है या विधानाला आता अजित पवार विरोध करत आहेत, याला काही अर्थ नाही. त्यांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, त्यांच्या सोबत रहायचे आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा हे ठीक नाही, असं जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. ते लातूर जिल्ह्यातल्या चाकुर इथ बोलत होते. अहमदपूर मतदार संघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी सभा घेतली, त्या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.  राज ठाकरे यांनी काय काम केले आहे? ते त्यांनाच माहीत असंही जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत, आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 400  खासदार हवे असे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळ बेर दिसत दिसत आहे. मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती  त्यांच्याच लोकांनी सांगितली. घटना दुरुस्ती करण्याच पाप यांच्या मनात होतं असं टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....