AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलाकेंद्रातील नर्तकीच्या प्रेमात ठार वेडा, भांडण झाले म्हणून थेट…धक्कादायक घटनेनं महाराष्ट्रात खळबळ!

काही दिवसांपूर्वी कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंचाने आत्महत्या केली होती. आता अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

कलाकेंद्रातील नर्तकीच्या प्रेमात ठार वेडा, भांडण झाले म्हणून थेट...धक्कादायक घटनेनं महाराष्ट्रात खळबळ!
dharashiv kala kendra crime newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 09, 2025 | 6:13 PM
Share

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही 9 मराठी डिजिटल : प्रेमात माणूस वेडा होतो, असे म्हटले जाते. एकमेकांना मिळवण्यासाठी प्रेमी जीवाचं रान करतात. पण हेच टोकाचे प्रेम कधी-कधी घातक ठरते. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरण राज्यभरात चर्चेत आले होते. गोविंद बर्गे हे कलाकेंद्रात नृत्यकाम करणाऱ्या पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडले होते. त्यांनी नंतर पूजा गायकवाड हिच्या बार्जी तालुक्यातील गावात जाऊन कारमध्येच स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. आता पुन्हा एकदा असेच एक हादरवून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. धाराशीवच्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे या तरुणाचे लग्न झालेले होते. तरीदेखील तो कलाकेंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या प्रेमात पडला होता. या तरुणाच्या आत्महत्याप्रकरणाने सगळीकडेच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात साई कला केंद्र आहे. येथे एक महिला नृत्यकाम करते. अश्रूबा अंकुश कांबळे नावाचा 25 वर्षीय तरुण या महिलेच्या प्रेमात होता. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. अश्रूबा कांबळे हा रुई ढोकी या गावचा रहिवासी होता. कला केंद्रात काम करणारी महिला आणि अश्रूबा कांबळे हे 8 डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येते देवदर्शनाला गेले होते. पण परत येताना त्यांच्यात वाद झाला होता. हाच वाद नंतर वाढत गेला आणि यातूनच अश्रूबा या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेमका वाद का झाला?

अश्रूबा आणि कलाकेंद्रात काम करणार नर्तकी शिंगणापूरहून परतत होते. याच वेळी अश्रूबा कांबळे या तरुणाला त्याच्या पत्नीचा फोन आला. त्यानंतर नर्तकी आणि अश्रूबा यांच्यात वाद झाला. हा वाद चालू असतानाच मी आत्महत्या करतो म्हणून अश्रूबा यांनी धमकी दिली होती. परंतु प्रेयसी नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तरुणाने चोरखळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नर्तकी महिलेला घेतले ताब्यात

ही घटना समोर येताच येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे असून पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या नर्तकी महिलेने अश्रूबा कांबळे यांना त्रास दिला होता का? याचा पोलीस शोधघेत आहेत. दरम्यान या घटनेनंतर धाराशीवमध्ये खळबळ उडाली असून तपासात कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.