AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 29 ऑगस्टनंतर…. म्हणाले, आता 7 कोटी मराठा…

मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला 29 ऑगस्टचा अल्टिमेटम दिला आहे.

मनोज जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 29 ऑगस्टनंतर.... म्हणाले, आता 7 कोटी मराठा...
| Updated on: Jun 16, 2025 | 4:03 PM
Share

मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गा लावावा अशी मागणी करत आहेत. मराठे आणि कुणबी एकच असून राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी ते करत आहेत. मात्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही, असं जरांगे यांनी म्हटलंय. तसेच जरांगे यांनी सरकारला यावेळी थेट अल्टिमेटम दिलंय. येत्या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा गुलाल घेऊन येतो. मी 29 ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मराठा आणि कुणबी एक आहे

मनोज जरांगे हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण तसेच त्यांची आगामी रणनीती याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 14 जून रोजीपासून फोन करणार आहे. आम्ही प्रत्येक आमदाराला अंतरवाली सराटीमध्ये बोलवणार आहोत. विधानपरिषदेच्या आमदारांनाही आम्ही बोलवणार आहोत. यात आजी-माजी आमदार, खासदारही असतील. मराठा आणि कुणबी एक आहे. त्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारीत करावा. सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या आम्ही त्यांना करणार आहोत.

मुंबईत आलो तर परत जाणार नाही

मी 29 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही शब्द बोलणार नाही. आजपासून तीन महिने मी कोणालाही काहीही बोलणार नाही. येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. आम्ही गुलाल घेऊन येतो. पण 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईत यायची वेळ येऊ देऊ नका. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी यावेळी मुंबई सोडणार नाही. माझ्या समाजाने वाशी येथून परत जाऊन तुम्हाला वेळ दिला होता. आता मात्र आम्ही वापस जाणार नाहीत. आमची अडवणूक करू नका, आमची फसवणूक करू नका. आमची मुलं फाशी घेत आहेत.

यावेळी दहापट मराठा…

सोपा विषय आहे. आमच्या नावावर सातबारा असेल तर शेत मोजून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. 29 ऑगस्टनंतर मी कोणलाही जवळ येऊ देणार नाही. यावेळी दहापट मराठा मुंबईत जातील. सर्व सात कोटी मराठा हे मुंबईत असतील, असा अशाराच मनोज जरांगे यांनी दिला.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.