AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझं डोक पिसाळलं तर…’ मनोज जरांगे पाटील कुणावर भडकले?; असं काय घडलं?

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. या घटनेनंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

'माझं डोक पिसाळलं तर...' मनोज जरांगे पाटील कुणावर भडकले?; असं काय घडलं?
Manoj Jarange Patil
| Updated on: Dec 10, 2024 | 8:57 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. त्यानंतर आता बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं, आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, नागरिकांनी एक एसटी बस पेटवल्याची देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मस्साजोग गावाला भेट दिली, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. या हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.  आम्ही सीआयडी चौकशी करतो असा निरोप आला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही सरकारी वकील देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एफआयआर चुकीचा झाला आहे. दोन पोलिसाचं निलंबन करायला हवं, त्यांनी  302 चं कलम लावायला पाहिजे होतं. आरोपींना अटक व्हायरला पाहिजे. त्या दोन्ही पोलिसांचं निलंबन व्हाव.

आता तर हत्या झाली आहे, ही परिसीमा आहे. माज करू नका हे खूप वाईट आहे. एकदा जर  मराठे बिथरले तर समाज मोठा उठाव करेल. हत्या होऊनही आमचे लोक संयमात आहेत.   भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, आम्ही जातीचा रंग दिलेला नाही. माझं डोकं पिसाळलं तर मी कोणाचं ऐकणार नाही असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं? 

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून कोणालाही सोडणार नाही असं बीडच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन