AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझं डोक पिसाळलं तर…’ मनोज जरांगे पाटील कुणावर भडकले?; असं काय घडलं?

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. या घटनेनंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

'माझं डोक पिसाळलं तर...' मनोज जरांगे पाटील कुणावर भडकले?; असं काय घडलं?
Manoj Jarange Patil
| Updated on: Dec 10, 2024 | 8:57 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहारण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला. त्यानंतर आता बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं, आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, नागरिकांनी एक एसटी बस पेटवल्याची देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मस्साजोग गावाला भेट दिली, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. या हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.  आम्ही सीआयडी चौकशी करतो असा निरोप आला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही सरकारी वकील देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एफआयआर चुकीचा झाला आहे. दोन पोलिसाचं निलंबन करायला हवं, त्यांनी  302 चं कलम लावायला पाहिजे होतं. आरोपींना अटक व्हायरला पाहिजे. त्या दोन्ही पोलिसांचं निलंबन व्हाव.

आता तर हत्या झाली आहे, ही परिसीमा आहे. माज करू नका हे खूप वाईट आहे. एकदा जर  मराठे बिथरले तर समाज मोठा उठाव करेल. हत्या होऊनही आमचे लोक संयमात आहेत.   भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, आम्ही जातीचा रंग दिलेला नाही. माझं डोकं पिसाळलं तर मी कोणाचं ऐकणार नाही असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं? 

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून कोणालाही सोडणार नाही असं बीडच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

Follow Us
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने...
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...