AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला जाण्याचा फैसला कधी घेणार?, ‘या’ तारखेला होणार फैसला; मनोज जरांगेच्या निर्णयाने सरकारला टेन्शन

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याची तारीख ही या दिवशी ठरवणार असल्याचं म्हटले आहे.

मुंबईला जाण्याचा फैसला कधी घेणार?, 'या' तारखेला होणार फैसला; मनोज जरांगेच्या निर्णयाने सरकारला टेन्शन
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 13, 2024 | 8:59 PM
Share

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दरम्यान क्रांती चौक परिसरात दाखल झाली. याच क्रांती चौक परिसरात मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या संखेने जमलेल्या मराठा बाधवांसोबत संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रॅलीचा समारोप झाला. मनोज जरांगे पाटील यांची पुढची दिशा काय असणार याकडे  सर्व मराठा बांधवांचं लक्ष लागलं होतं.

मी दिमागाने खेळतो – जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘मी थांबून निर्णय घेत असतो. मी सर्व दिमागाने खेळत असतो. प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नाही. बुद्धीचाही वापर करायचा असतो. फडणवीस, शिंदे, अजितदादा आणि महाजन यांनाही डावात हरवलं. सोपी गोष्ट नाही. भुजबळ आता काहीही बडबडताय. प्रत्येक वेळी सरकार फसलं. त्यांनी आपल्याला फसवण्याचं काम केलं. त्यांना मी जे वाटलो होतो, तसा मी नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे मला वेळ देत जा. एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही. समाज फसला तर मी स्वतला आयुष्यभर माफ करणार नाही. मला तुमच्या जीवावर काहीच कमवायचं नाही. मला तुमची पोरं मोठी झालेली पाहायचे आहे.’

20 तारखेला आमरण उपोषण

‘मी येडा आहे. पण आरक्षण दिलं ना मिळवून. भुजबळ पायावर चालत असेल मी डोक्यावर चालतो. पण माझ्यामुळे तुला औषधे सुरू केली ना फडणवीस साहेब शिंदे साहेब आरक्षण द्या. ही गर्दी फक्त संभाजीनगराची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल. सरकारला एकच संधी. २० तारखेला तारीखच जाहीर करणार आहे. २८८ उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. त्या दिवशी मराठ्यांनी अमूक अमूक मैदानावर यावं. २० तारखेला आमरण उपोषण सुरू करणार. पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचं या दोन तारखा ठरवायच्या आहेत. एकदा जे ठरलं त्यात बदल नाही.’

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?