AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील एका माणसामुळे अनेकांनी पक्ष सोडला; अजित पवार यांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका

पुढे मी नांदेड,परभणीला जाणार आहे. तिथेही पक्षप्रवेश आहेत. हवशे नवशे गवशे सगळे येतात आणि म्हणतात की मला महामंडळ द्या, मला DPDC चं हे द्या, पण आपण काय केलं याचा वापर करा असाही सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ठाण्यातील एका माणसामुळे अनेकांनी पक्ष सोडला; अजित पवार यांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका
| Updated on: Feb 18, 2025 | 8:41 PM
Share

राज्याच्या अर्थ संकल्पाला शिस्त लावण्याचा आपला विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.’लाडकी बहिण योजना’ सुरुच रागणार आहे.महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छीतो की ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पढे म्हणाले की मंगळवारचा दिवस हा माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. कॅबिनेट,  प्री-कॅबिनेट असते. आता अर्थसंकल्प सादर करायचा आहे. उद्या शिवजयंती असल्याने मी आणि एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सकाळी सात वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाऊन नतमस्तक होणार आहोत.

आमचा शिवस्वराज्य सप्ताह सुरु होणार आहे. मी तरुण होतो तेव्हा  एकत्र राष्ट्रवादी होती त्यातून काम करत इथपर्यंत आलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट सध्या सुरू आहे. जो जोरदार सुरू आहे. ठाणे जिल्हा मोठा जिल्हा आहे. त्यातून पालघर वेगळा  काढला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाई प्रकल्प आणि काळू प्रकल्पाबाबत अनेक मतप्रवाह आहेत, पण ते प्रकल्प वेळेत पूर्ण  झाले पाहिजे. अभिजित पवार आले, ते कोणासोबत काम करायचे माहित होते, ती भावकी होती तरी माझ्याकडे यायला उशीर लागला. अभिजीत जात असताना अनेकांचे आतापर्यंत देखील फोन येत होते, बोलले मार्ग काढू, मग आतापर्यंत काय गोट्या खेळत होते? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.

जुन्यांचा देखील मान राखला जाईल

ठाण्यातील एका माणसामुळे अनेक लोक गेले. मी वरिष्ठांना अनेकदा सांगितलं. पण चूकच करायची ठरवली तर कोणीच काहीच करू शकत नाही. माझी पत्नी लोकसभेला ४८ हजार मतांनी पडली. बारामतीतच मत कमी, एवढं काम केलं होतं. पण मतदारांचा हक्क असतो. ‘लाडकी बहिण’ योजना यशस्वी झाली. लोकाभिमुख काम देखील करायची असतात. नेत्याकडे व्हीजन असले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. उमेदवारी देताना नव्या जुन्याचा समन्वय साधून उमेदवारी दिली जाईल. पक्षात जेव्हा बेरीज वाढते तेव्हा जुन्याना वाटतं की आम्ही अडचणीच्या काळात सोबत होतो, तेव्हा आमचे काय ? पण जुन्यांचा देखील मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.