AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे संतापले, म्हणाले, सरकारला नासकी सवय, 30 ते 35 मंत्री या नाही तर दोघे…

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही न्याय देवतेचे सन्मान करतो आणि प्रत्येक आदेशाचे पालन करतो. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते.

मोठी बातमी! मनोज जरांगे संतापले, म्हणाले, सरकारला नासकी सवय, 30 ते 35 मंत्री या नाही तर दोघे...
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 02, 2025 | 11:12 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये ते मोठ्या संख्येने जमले आहेत. आंदोलकांच्या गाड्यांमुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी बघायला मिळाली. कोर्टाने यावर भाष्य केल्यानंतर रात्री आंदोलकांनी रस्त्यावरील गाड्या हलवल्या. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा देत म्हटले की, आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल. शिंदे समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतलीये.

मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसले आहेत. सरकारने भीती दाखवली तरीही आम्ही मागे हटणार नाहीत. मी तर मेलो तरीही या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचे ते होऊद्या. याचे दुश्मपरिणाम तुम्ही (देवेंद्र फडणवीस) जाणे आणि मराठे जाणे. मराठे काय असतात ते पुन्हा साडेतीनसे वर्षांनी बघायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. सरकारला नासकी सवय लागल्याचेही त्यांनी म्हटले.

पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे कुटील डाव खेळू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेला खोटी माहिती देतात. आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी आहे. 30 ते  35 मंत्री या नाही तर दोघे या आमची चर्चा करण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांचा आम्ही सन्मान करू. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायच्या नसतो, असे म्हणत त्यांनी थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.

कितीही आडवे तरीही तुम्हाला मराठ्यांची पोरं मुंबईत शनिवार रविवारच्यानंतर दिसतील. देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे हे आंदोलन सुरू आहे. मराठे मुंबईत येणार, त्यांना कोणीही अडवू शकत नाही, ते मुंबईत येणार. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात अजूनही काही नाही. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय. त्यांनी आम्हाला परवानग्या दिल्या नाहीत, भाकरी दिल्या नाहीत, पाणी दिले नाही, असे म्हणताना जरांगे पाटील हे दिसले आहेत. सध्या मराठा उपसमितीचे बैठक देखील सुरू आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.