AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप केली. यादरम्यान त्यांनी ओबीसी आरक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भाजपा नेते प्रसाद लाड आज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली.

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..
Manoj Jarange Patil
| Updated on: May 22, 2026 | 11:41 AM
Share

भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता त्यांच्या घरी गेले. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेकरिता 23 मे 2026 पूर्वी माझ्याकडे या असे म्हटले होते. त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीकरिता गेले. यादरम्यान ते छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असताना त्यांना धमकी देण्यात आली. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीकरिता जाण्यापूर्वी म्हटले होते की, मी भाजपा आमदार किंवा नेता म्हणून नाही तर माझ्या भावाच्या आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे चर्चेकरिता जात आहे. प्रसाद लाड यांना मिळालेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. स्वत: भागवत कराड हे प्रसाद लाड यांच्यासोबत दिसले.

मनोज जरांगे यांच्यासोबत बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचेही बघायला मिळाले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना बोलताना म्हटले की, आम्ही ओबीसीचे आरक्षण मागत नाहीत तर आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. आमचे लेकरं आज दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, ऊसतोडी करतात, स्वत: जे वावर असूनही.

त्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिलं जातं. ओबीसीचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटतंय तेच आम्हाला कळत नाही. ओबीसी आरक्षणाला नेमका निकष काय लावला? आम्हाला तीन वेळा मागास सिद्ध केले तरीही आरक्षण मिळत नाही. 1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण दिले?

आमचे गॅझेट आहे तर आम्हाला आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसगट प्रमाणतपत्रे का दिली जात नाहीत? 4 वर्षात ओबीसींची संख्या 30 टक्के वाढली कशी, असाही मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या बोलण्याने पुन्हा एकदा मराठा विरूद्ध ओबीसी असा मुद्दा उपस्थित राहत आहे. यादरम्यान त्यांनी म्हटले की, मंडळाने कोणता सर्व्हे केला दाखवा, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा