AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप केली. यादरम्यान त्यांनी ओबीसी आरक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भाजपा नेते प्रसाद लाड आज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली.

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..
Manoj Jarange Patil
| Updated on: May 22, 2026 | 11:41 AM
Share

भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता त्यांच्या घरी गेले. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेकरिता 23 मे 2026 पूर्वी माझ्याकडे या असे म्हटले होते. त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीकरिता गेले. यादरम्यान ते छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असताना त्यांना धमकी देण्यात आली. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीकरिता जाण्यापूर्वी म्हटले होते की, मी भाजपा आमदार किंवा नेता म्हणून नाही तर माझ्या भावाच्या आणि मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे चर्चेकरिता जात आहे. प्रसाद लाड यांना मिळालेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. स्वत: भागवत कराड हे प्रसाद लाड यांच्यासोबत दिसले.

मनोज जरांगे यांच्यासोबत बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचेही बघायला मिळाले. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना बोलताना म्हटले की, आम्ही ओबीसीचे आरक्षण मागत नाहीत तर आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत. आमचे लेकरं आज दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, ऊसतोडी करतात, स्वत: जे वावर असूनही.

त्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिलं जातं. ओबीसीचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटतंय तेच आम्हाला कळत नाही. ओबीसी आरक्षणाला नेमका निकष काय लावला? आम्हाला तीन वेळा मागास सिद्ध केले तरीही आरक्षण मिळत नाही. 1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण दिले?

आमचे गॅझेट आहे तर आम्हाला आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसगट प्रमाणतपत्रे का दिली जात नाहीत? 4 वर्षात ओबीसींची संख्या 30 टक्के वाढली कशी, असाही मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या बोलण्याने पुन्हा एकदा मराठा विरूद्ध ओबीसी असा मुद्दा उपस्थित राहत आहे. यादरम्यान त्यांनी म्हटले की, मंडळाने कोणता सर्व्हे केला दाखवा, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल