AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांनी म्हटले, माझा एकच विरोधक… ‘त्या’ व्यक्तीवर पुन्हा हल्लाबोल

आपण कधीच खोटं बोलत नाही. आपली विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेला मराठा मैदानात उतरणार आहे. काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी माझे नाव वापरून जातीचे नुकसान करत आहे. माझे नाव वापरुन तुम्हाला आर्थिक फायदा काय मिळेल, हे माहीत नाही पण समाजाचे वाटोळे करू नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी म्हटले, माझा एकच विरोधक... 'त्या' व्यक्तीवर पुन्हा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 28, 2024 | 10:25 AM
Share

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रीय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला नाही. परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. नारायण गड येथे आयोजित कार्यक्रमात मनोज जरांगे बोलत होते. यावेळी राज्यात आपला एकच विरोधक आहे. इतर कोणाला आपण विरोधक मानत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता सांगितले.

काय म्हणाले मनोज जरांगे

राज्यात येवला वाल्याला सोडता मी कुणाला विरोधक मानले नाही. आपले कोणीच विरोधक नाही. त्यांना कुणी ओबीसी नेता मानत नाही, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. आपण लोकसभा निवडणुकीत नाही. या निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही. जे सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे, त्याचा विचार करा. जे सगे सोयऱ्याच्या बाजूने नाही, त्यांना पाडा. त्यांचा पराभव असा करा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नये. त्यांना पाडण्यात आपला विजय आहे. मी कुणाला कॉल केला नाही की कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

समाजाचे नुकसान करु नका…

आपण कधीच खोटं बोलत नाही. आपली विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेला मराठा मैदानात उतरणार आहे. काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी माझे नाव वापरून जातीचे नुकसान करत आहे. माझे नाव वापरुन तुम्हाला आर्थिक फायदा काय मिळेल, हे माहीत नाही पण समाजाचे वाटोळे करू नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न

ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीवर चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच गाडीवर शाई फेकण्यात आली आहे, यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणी करु नये. परंतु या माध्यमातून मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ओबीसी मत मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टँट केले जात आहे. प्रत्येकाला आपले मत आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे.

Follow Us
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.