AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आझाद मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांच्या नोटीशीवर मनोज जरांगेंनी घेतली ठाम भूमिका, आता संघर्ष शिगेला

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात तणाव वाढला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच आहे. पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावली आहे परंतु ती स्वीकारण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे.

आझाद मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांच्या नोटीशीवर मनोज जरांगेंनी घेतली ठाम भूमिका, आता संघर्ष शिगेला
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 02, 2025 | 2:19 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणासाठी आझाद मैदानात बसले आहेत. आता या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनोज जरांगे यांच्यात तणाव वाढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीने ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, आंदोलकांना दक्षिण मुंबईतील सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि इतर भागांतून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या कोअर कमिटी सदस्यांना नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये, आंदोलनासाठी दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, हे आंदोलन फक्त एक दिवसासाठी आणि ठराविक वेळेसाठी होतं. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु ठेवले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

आंदोलनासाठी परवानगी नाही

आता पोलिसांनी बजावलेली ही नोटीस मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी या नोटीसवर सही केलेली नाही. त्यांच्यासोबतच कोअर कमिटीच्या सदस्यांनीही ही नोटीस नाकारली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५ आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं नाही. त्यामुळे, यापुढे आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात येत असून, त्यांनी आझाद मैदान तात्काळ रिकामे करावे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही

दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने नामवंत वकील सतिश माने शिंदे हे मैदानात उतरले आहेत. माने शिंदे हे उच्च न्यायालयात आंदोलनांची बाजू मांडत असून सुरुवातीलाच आंदोलकांकडून झालेल्या गैरकृत्याबद्दल न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.