AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन ओळीचा हातावर मेसेज… अन् तिने आयुष्य संपवलं, त्या घटनेने अख्खं सोलापूर हादरलं; आरोपी कोण?

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने हातावर संदेश लिहून जीवन संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन ओळीचा हातावर मेसेज... अन् तिने आयुष्य संपवलं, त्या घटनेने अख्खं सोलापूर हादरलं; आरोपी कोण?
CrimeImage Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2026 | 7:30 PM
Share

जग आधुनिकतेकडे जात असताना आजही विवाहित महिलांचा छळ होत असल्याच्या घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने हातावर संदेश लिहून जीवन संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या सासरच्या लोकांना अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विवाहितेची आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे विवाहितेने हातावर संदेश लिहून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासू, सासरे आणि पतीला अटक केली आहे. विवाहितेवर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप या सर्वांवर आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील अंकुश लोंढे आणि आई कविता लोंढे यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा देऊन आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

खुळेवाडी गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेने आत्महत्येपूर्वी हातावर संदेश लिहून आपला छळ होत असल्याचा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या आधारे सासू, सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली आहे.

आरोपींना फाशीची मागणी

मयत विवाहितेने पार्लरचा कोर्स सुरू केला होता. मात्र हा कोर्स करू नये म्हणून, तसेच विवाहाला पाच वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आता हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी मयत मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.

दरम्यान, आता विवाहितेच्या पालकांसह गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. आता आगामी काळात न्यायालय या प्रकरणी काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.