AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. अशोक पाल हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, कॉलेज ट्रान्सफरसाठी निवेदन, डीनवर आर्थिक शोषणाचे आरोप

विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांनी तत्कालीन डीन डॉ. कांबळे यांच्यावर आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

डॉ. अशोक पाल हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, कॉलेज ट्रान्सफरसाठी निवेदन, डीनवर आर्थिक शोषणाचे आरोप
yavatmal medical college
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 7:30 PM
Share

यवतमाळ: डॉ. अशोक पाल हत्याकांड प्रकरणानंतर यवतमाळ शाककीय वैद्यकीय माहविद्यालयातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज या विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. विद्यार्थ्यांनी तत्कालीन डीन डॉ. कांबळे यांच्यावर आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

डॉ. कांबळे यांच्यावर काय आरोप केले ?

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तत्कालीन डीन डॉ. कांबळे यांच्या विरोधात आर्थिक शोषणाचे आरोप केले. मेडिकल ऑफिसर पोस्टिंगसाठी 50 हजार आणि इंटर कम्प्लिशनसाठी 15 हजार रुपये हॉल तिकीटसाठी 5000 रुपये मागितले जातात, असे विद्यार्थ्यांनी म्हैसैकर यांना सांगितले. तसेच होस्टेलसाठी 15 हजार मागितले जातात अशी व्यथादेखील विद्यार्थ्यांनी मांडली.

250 विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलीसाठी निवेदन

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ विद्यार्थी डॉ. अशोक पाल यांची 11 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. येथील 250 विद्यार्थ्यांनी कॉलेज बदलीकरिता म्हैसेकर यांना निवेदन दिले आहे.

पेट्रोलिंग कार हवी, नियमित डीन असावेत, पोलीस सुरक्षा गार्ड पाहिजे

तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास पेट्रोलिंग कार हवी, नियमित डीन असावेत, पोलीस सुरक्षा गार्ड पाहिजे अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच येथे मुली असुरक्षित आहेत. येथे बेसिक मेडिसीन उपलब्ध नाहीयेत. ग्लोज लिहून द्यावे लागतात. तसेच विद्यालयातील एक्सरे बंद आहेत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग नाही अशा समस्या विद्यार्थ्यांनी म्हैसेकर यांना सांगितल्या.

डॉ. अशोक पाल यांची हत्या कशी झाली ?

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाविद्यालयात दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता. मात्र या ठिकाणी शहरातील कॅम्पस बाहेरील काही व्यक्ती या ठिकाणी आल्या होत्या. त्यांच्यात आणि शिकाऊ डॉक्टरांमध्ये वाद झाला होता. हे बाहेरील व्यक्ती मुलींच्या वसतिगृहाजवळ लघुशंका करत होते. त्यातून या वादाला सुरुवात झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. याच वैमनस्यातून काल रात्री 10 वाजताच्या सुमारास लायब्ररीमधून अशोक हॉस्टेलकडे जात असताना दोन ते तीन अज्ञात मारेकऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत निर्मनुष्य जागी नेत अशोकवर धारधार शास्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोकचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला.

इतर बातम्या :

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, पटोलेंचं आवाहन; भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

ST Strike: परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक; कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, पुन्हा एक चर्चेची फेरी

आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.