AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार

Ashish Shelar : "अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंना घेऊन दिल्लीला जायला पाहिजे. फक्त घरी बसून पाठिंबा देऊन काही होणार नाही" असं अंजली दमानिया म्हणाल्या. "आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार आहे. अंजली दमानिया जे अमित ठाकरेंना बोलल्यात, त्यावर अमित ठाकरे यांनी उत्तर द्यावं" असं आशिष शेलार म्हणाले.

Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार
Uddhav Thackeray-Ashish Shelar
| Updated on: Jul 18, 2026 | 3:16 PM
Share

उद्धव ठाकरे आज नागपूरात आहेत. तिथे ते रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “राम मंदिर तिजोरीत झालेला अपहर यावर आंदोलन असेल तर उत्तर प्रदेश सरकारने यात ज्यांचा हात आहे, त्यांच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे. यात अटक देखील झाली आहे. काही व्यक्तींनी राजीनामा देखील दिलाय. उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेलं नाही” असं आशिष शेलार म्हणाले. “राजकारण यात आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. आज उबाठा सेना जे आंदोलन करत आहे, राम भक्ती यावर बोलण्याअगोदर हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. प्रभू राम यांचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. हे आंदोलन तोंड देखले पणाचं आहे. या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे. त्या मंडळींना बरं वाटव म्हणून उद्धव जी आंदोलन करत आहेत का?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या विषयावर म्हणाले की, “दोन भावांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. दोन पक्षांनी एकत्र यावं की न यावं हा उबाठा आणि मनसेचा प्रश्न आहे. विषय रामाचा असल्याने राम रक्षा घेत आहेत पण प्रभू राम चंद्र यांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना कसा त्रास दिलाय आपण बघितलंय”

संजय राऊत बालिश आहेत

संजय राऊत यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर कारवाई झाली, त्यावरुन सरकारवर टीका केली. त्यावर आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. “संजय राऊत बालिश आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार काम करण्यात आलंय. पोलीस कारवाई संवेदनशील आहे. त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत” असं शेलार म्हणाले.

आंदोलन करण्याचा हक्क सर्वांनाच

“आंदोलन करण्याचा हक्क सर्वांनाच आहे. आंदोलन करणाऱ्यांच्या मागणी बाबत बोलायचं झाल्यास नीटच्या परीक्षेबद्दलची गडबड पोलिसांनी त्यावर कारवाई केली. आरोपीना अटक झाली. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलं नाही. व्यक्तिशः कोणाचा हातभार आहे असं ही नाहीय. चौकशी, अटक आणि त्यावरच उत्तर शोधल्यावर नीटची परीक्षा झाली” असं आशिष शेलार म्हणाले. जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही बोलले

“महाविकास आघाडी एकत्र नाही यात तथ्य आहे राम रक्षा आंदोलनात काँग्रेस सहभागी नाही. संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देतात पण नाना पटोले यांना बोलवत नाहीत” याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर म्हणाले की, चर्चांवर उत्तर काय देऊ, दोघांनी चर्चा करावी मग ठरेल.

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?