AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरुवात ठाण्यातून झाली आता इतिहासही…, राऊतांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून हल्लाबोल

आज ठाण्यामध्ये शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सुरुवात ठाण्यातून झाली आता इतिहासही..., राऊतांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून हल्लाबोल
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 02, 2025 | 8:14 PM
Share

आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यातून आहे, टेंभी नाक्यावर आलो आहे, धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी, पण गद्दारांना महिलांना पुढे करण्याची सवयच आहे. हे दिवस ही जातील, सुरुवात ठाण्यातून झाली होती, नवा इतिहासही ठाण्यातच होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत 

प्रत्येकजण सांगतोय मला राऊत सांहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण मी म्हणतोय मला आज बोलायचं नाहीये, कोणी बोलूच नका. आज शिवसैनिकांना बोलू द्या, पण आज आम्ही जी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली स्वारी ही ठाण्यावर आहे. मी ठाण्यामध्ये प्रवेश केला नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारे साहेबांनी आनंद नगर नाक्यावर स्वागत केलं. तेव्हा मी म्हणालो परत एकदा आपले जुने वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत.

टेंभी नाक्यावर आलो, धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवाद करण्यासाठी पोहोचलो, तेव्हा पाच पंचवीस महिला समोर आल्या, गद्दारांना महिलांना पुढे करायची सवयच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत. हे फक्त होर्डिंग लावतात, यांचा वारसदार म्हणून जन्म गुजरातला झाला आहे. जेव्हा शंभर रेडे कापले तेव्हा एक जन्माला आला. त्यामुळे ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, ठाणेकरांनी निष्ठा काय असते हे वारंवार महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते जेव्हा टेंभी नाक्यावर पोहोचले, तेव्हा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, यावरून देखील राऊत यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.  आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पण आनंद आश्रम कोणत्या तरी खासगी व्यक्तीनं आपल्या नावावर करून घेतला आहे. तो आता दिघे साहेबांचा आश्रम राहिला नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.