AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded: एवढा पाऊस पडूनही पाण्यासाठी भटकंती, विष्णुपुरी प्रकल्पापासून 5 किमी अंतरावरची स्थिती, नेमकं कारण काय ?

शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पापासून अवघ्या पाच किलोमीटर असंतावर असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, तुप्पा, वाजेगाव या चार गावांना मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वीजबिल थकल्यामुळे गावातील महावितरणने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे.

Nanded: एवढा पाऊस पडूनही पाण्यासाठी भटकंती,  विष्णुपुरी प्रकल्पापासून 5 किमी अंतरावरची स्थिती, नेमकं कारण काय ?
नांदेडमधील गावांमध्ये वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 13, 2021 | 11:18 AM
Share

नांदेडः शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पापासून (Vishnupuri Dam) अवघ्या पाच किलोमीटर असंतावर असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, तुप्पा, वाजेगाव या चार गावांना मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मराठवाड्यात या वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतरही ऐन हिवाळ्यात नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याचे कारण म्हणजे महावितरण! थकीत बिलापोटी महावितरणने मागील पंधरा दिवसांपासून या चारही गावांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना हा त्रास भोगावा लागत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरुवातीला एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने तपासणीचे बिल भरले नाही. त्यामुळे या बिलावर पुढे व्याजावर व्याज लागल्याने 4 कोटी 81 लाख 48 हजार 970 रुपयांच्या जवळपास रक्कम थकीत आहे. ही योजना जिल्हा परिषदेकडे 2005 मध्ये हस्तांतरीत झाली. पण तेव्हा बिल भरलेले नव्हते. मागील काही वर्षांपासून महावितरण वारंवार अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित करत आहे. थकीत बिलापोटी यापूर्वी महावितरणला 10 लाखांचा धानदेश देण्यात आला होता. तरीही वीजपुरवठा खंडित केला गेलाय, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटले आहे.

15 दिवसांपासून 4 गावात वीज नाही

महावितरणने मागील 15 दिवसांपासून या चारही गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या चारही गावांमध्ये मिळून एकूण जवळपास 54 हजार लोकसंख्या आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

इतर बातम्या-

Sanjay Raut: ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात: संजय राऊत

एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम, आज संपतंय, काय कारवाई होणार, आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक