AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded: एवढा पाऊस पडूनही पाण्यासाठी भटकंती, विष्णुपुरी प्रकल्पापासून 5 किमी अंतरावरची स्थिती, नेमकं कारण काय ?

शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पापासून अवघ्या पाच किलोमीटर असंतावर असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, तुप्पा, वाजेगाव या चार गावांना मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वीजबिल थकल्यामुळे गावातील महावितरणने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे.

Nanded: एवढा पाऊस पडूनही पाण्यासाठी भटकंती,  विष्णुपुरी प्रकल्पापासून 5 किमी अंतरावरची स्थिती, नेमकं कारण काय ?
नांदेडमधील गावांमध्ये वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 13, 2021 | 11:18 AM
Share

नांदेडः शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पापासून (Vishnupuri Dam) अवघ्या पाच किलोमीटर असंतावर असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, तुप्पा, वाजेगाव या चार गावांना मागील पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मराठवाड्यात या वर्षी विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतरही ऐन हिवाळ्यात नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याचे कारण म्हणजे महावितरण! थकीत बिलापोटी महावितरणने मागील पंधरा दिवसांपासून या चारही गावांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना हा त्रास भोगावा लागत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरुवातीला एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने तपासणीचे बिल भरले नाही. त्यामुळे या बिलावर पुढे व्याजावर व्याज लागल्याने 4 कोटी 81 लाख 48 हजार 970 रुपयांच्या जवळपास रक्कम थकीत आहे. ही योजना जिल्हा परिषदेकडे 2005 मध्ये हस्तांतरीत झाली. पण तेव्हा बिल भरलेले नव्हते. मागील काही वर्षांपासून महावितरण वारंवार अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित करत आहे. थकीत बिलापोटी यापूर्वी महावितरणला 10 लाखांचा धानदेश देण्यात आला होता. तरीही वीजपुरवठा खंडित केला गेलाय, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभाग व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटले आहे.

15 दिवसांपासून 4 गावात वीज नाही

महावितरणने मागील 15 दिवसांपासून या चारही गावांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या चारही गावांमध्ये मिळून एकूण जवळपास 54 हजार लोकसंख्या आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

इतर बातम्या-

Sanjay Raut: ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात: संजय राऊत

एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम, आज संपतंय, काय कारवाई होणार, आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

Follow Us
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?