AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत जीवघेणा पाऊस, 12 जणांचा मृत्यू; मानखुर्दच्या दुर्घटनेवर कोण काय-काय म्हणालं? जाणून घ्या

mankhurd chawl collapse : महामुंबईत भीषण दुर्घटना घडून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईच्या मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत जीवघेणा पाऊस, 12 जणांचा मृत्यू; मानखुर्दच्या दुर्घटनेवर कोण काय-काय म्हणालं? जाणून घ्या
| Updated on: Jul 06, 2026 | 7:54 AM
Share

मुंबईत गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत महामुंबईत वेगवेगळ्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर,कुर्ला, मानखुर्द या भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 5 बालकांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन मदतीला धावले आहेत. या घटनास्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही भेट दिली. त्यानंतर प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत.

मानखुर्दच्या जनतानगरमध्ये 3 मजली घर कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळतात NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि BMC कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेवर महापौर रितू तावडे म्हणाल्या, मानखुर्द दुर्घटनेत ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमीवर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेने तातडीने बचावकार्य हाती घेतले. मृतांच्या कुटुंबीयांची गोवंडी शताब्दी रुग्णालयात भेट घेऊन घेतली, प्रशासन सर्वतोपरी मदत करणार आहे. जखमीची प्रकृती स्थिर असून बाधित कुटुंबांच्या पाठीशी महापालिका ठामपणे उभी आहे’.

स्थानिक नगरसेवक नवनाथ बन म्हणाले, सदर जागा ही कलेक्टरटची जागा आहे. या जागेत अनेक वर्षांपासून झोपड्या बांधून राहताहेत. मुंबईत दोन-तीन मजली इमारती बांधणे अनधिकृत आहेत. तरी देखील तीन मजली घरे बांधून राहत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. खरंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून खबरदारी घेणे गरजेचे आहे. साधारण तीन मजली इमारतीचं बांधकाम हे बाजूच्या एक मजली घरावर कोसळलं. या घरात एकूण 6 जण होते. त्यात मुले, महिलेचा समावेश होता. घटनेनंतर तातडीने सर्व जण घटनास्थळी मदतीला पोहोचले. मोठ्या प्रमाणात मलबा कोसळल्याने घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला’

मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘मानखुर्दच्या जनतानगरमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी नाशिकहून थेट घटनास्थळी पोहोचलो असून परिस्थितीची पाहणी केली. या परिसरात अत्यंत अरुंद गल्ल्या असून एकावर एक मजले चढवून घरे बांधण्यात आली आहेत. तळमजल्यावरील सुमारे 12 बाय 12 फुटांच्या घरांवर तीन-तीन मजले उभारण्यात आले आहेत. ही बहुतांश बांधकामे अनधिकृत स्वरूपाची आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. मात्र, प्रचलित नियमांनुसार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळेल’.

9 तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेली शेळी जिवंत

मानखुर्द दुर्घटना ढिगाऱ्याखालून एक शेळी बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झालाय. मात्र मलब्याखालील शेळी जिवंत आढळली. जवळपास ९ तास ढिगाऱ्याखाली अडकलेली शेळी जिवंत बाहेर निघाली. अग्निशमन दल आणि RDMC च्या माध्यमातून रात्रभर काम सुरू होतं.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?