AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी माणूस खतरे में है, मग 30 वर्ष तुम्ही गोट्या खेळत होतात का? फडणवीसांचा ठाकरेंना थेट सवाल

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महायुतीची सभा पार पडली, या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मराठी माणूस खतरे में है, मग 30 वर्ष तुम्ही गोट्या खेळत होतात का? फडणवीसांचा ठाकरेंना थेट सवाल
देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 10:20 PM
Share

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली, तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली, या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  मराठी माणूस खतरे में है म्हणता, मग 30 वर्ष तुम्ही काय गोट्या खेळल्या का? असा थेट सवालच यावेळी ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

काल मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली,  काल जी सभा झाली त्यात तेच अपील, तीच कारण, तेच मुद्दे. खरं म्हणजे एकनाथ शिंदेंनी सांगितलं ही मुंबई ही कुणाच्या बापाच्या बापच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकणार नाही. मराठी माणूस अडचणीत दिसतोय, खतरे में दिसतोय, तर ३० वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होतात का? असा थेट सवाल यावेळी फडणवीस यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  २५ ते ३० वर्ष सत्ता राबवली. खुर्च्या उबवल्या. तरीही मराठी माणसाची ही अवस्था असेल तर चुल्लूभर पाणी में डुब मरो. आदित्य ठाकरेंनी उद्या दिवस भरात कधीही सांगावं या आमच्याकडून शीतल गंभीर येतील, करूया चर्चा. काय सांगतात तर ही शेवटची निडवणूक आहे. मुंबईकरांसाठी ही शेवटची निवडणूक नाही, मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक नाही, आम्ही पानीपतमध्ये लढणारे आहोत. आम्ही शौर्य गाजवणारे माणसं आहोत.

मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई नाही. तुमचं अस्तित्व पणाला लागलं आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही जनता आहे. मराठी म्हणजे ही जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे ही जनता आहे. आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला आवडतं, मला प्रॉब्लेम नाही. त्यांना समजायला पाहिजे, नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली? काकांना किमान चांगली नक्कल तरी करता येते, भाषण करता येते. तुमची काय अवस्था होईल ते पाहा, असं म्हणत फडणवीस यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.

Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!