Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा उकाडा, रात्री थंडी… मुंबईकरांनो, व्हा सावध.., तापमानात होतोय बदल

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात अनेक बदल होताना दिसत असून थंडीच शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा, अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे.

दिवसा उकाडा, रात्री थंडी... मुंबईकरांनो, व्हा सावध.., तापमानात होतोय बदल
मुंबईतील तापमानात बदल
Follow us
| Updated on: Feb 12, 2025 | 8:48 AM

मुंबईत थंडी हा प्रकार सहसा कधी आढळत नाही. फास्ट सुरू असलेला फॅन थोडा स्लो केला म्हणजे आली थंडी, अशीच परिस्थिती बऱ्याच मुंबईकरांनी अनुभवली असेल. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात अनेक बदल होताना दिसत असून थंडीच शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा, अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये कन्फ्युजन आहे. दरम्यान, ही स्थिती पुढील एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानाच्या तुलनेत नोंदले जाणारे तापमान हे एक ते दोन अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी कमाल तापमानाने 32.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. याचवेळी किमान तापमानात मात्र घट झाली होती. सांताक्रूझ येथे मंगळवारी 18.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

यामुळे उकाड्यात वाढ झाली असली, तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास मात्र मुंबईकरांना गारवा जाणवत आहे. त्यातच पुढील एक दोन दिवस मुंबईत किंचित थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तरेकडील थंड वारे फक्त उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकरांना थंडीसह उकाड्याचाही अनुभव घ्यावा लागणार आहे.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे.सध्या प्रदूषण वाढले असतानाच आता दिवसा प्रचंड उकाडा आणि पहाटे व रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. येत्या काळातही असेच वातावरण राहण्याची शक्यता असून त्यामुळे तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.