AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, दोघांचा मृत्यू; राज्यभरात कुठे किती जखमी?

महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवात यंदा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दोन तरुण गोविंदांचा मृत्यू झाला असून २५० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मुंबई, ठाणे आदी शहरांमध्ये अपघातांची संख्या मोठी आहे. उंचावरील थर आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन यामुळे हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.

दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, दोघांचा मृत्यू; राज्यभरात कुठे किती जखमी?
| Updated on: Aug 17, 2025 | 9:03 AM
Share

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. एकीकडे धो धो पाऊस कोसळत असताना दुसरीकडे दहीहंडी पथकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे दहीहंडी मोठ्या जल्लोषात सुरु असताना दुसरीकडे या उत्सवाला गालबोट लागले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात दोन तरुण गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २५० पेक्षा जास्त गोविंदा हे जखमी झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये झालेल्या अपघातांमुळे दहीहंडी उत्सवाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच गोविंदा पथकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दोन गोविंदांचा दुर्दैवी अंत

यंदाच्या दहीहंडी उत्सवात दोन तरुण गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील मानखुर्द येथील जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) हा गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना अचानक खाली पडला. त्याला तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे रोहन वाळवी (१४) या गोविंदाचा मृत्यू झाला. रोहनला कावीळ झाली असतानाही तो दहीहंडीसाठी आपल्या पथकासोबत आला होता. टेम्पोमध्ये बसलेला असताना त्याला अचानक चक्कर आली. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दोन्ही घटनांमुळे दहीहंडीच्या उत्साहाला दुर्दैवी गालबोट लागले आहे.

मुंबई, ठाण्यात शेकडो गोविंदा जखमी

या उत्सवादरम्यान मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील २५० हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. यात मुंबईतील २१० गोविंदा जखमी झाले आहेत. तर ठाणे, कल्याण डोंबिवलीत 30 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. रात्री १० वाजेपर्यंत मुंबईतील विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांमध्ये ९५ गोविंदांना उपचारासाठी आणण्यात आले होते. यापैकी ७६ जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, तर १९ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ९ वर्षांच्या आर्यन यादव आणि २३ वर्षांच्या श्रेयस चाळके या दोन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ठाणे शहरात दहीहंडीचा थरार सुरु असताना २२ गोविंदा जखमी झाले. तर कल्याण-डोंबिवलीत ८ गोविंदांना दुखापत झाली. या जखमींमध्ये अवघ्या ५ वर्षांच्या एका चिमुकल्याचा समावेश आहे. हा मुंबईच्या भांडुपमध्ये राहणारा असून त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ठाण्यातील १८ वर्षांच्या एका गोविंदाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीत 8 गोविंदा जखमी

कल्याण-डोंबिवलीमध्ये दहीहंडीचा थरार सुरू असताना 8 गोविंदा जखमी झाले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारानंतर लगेचच सोडून देण्यात आले. बिर्ला कॉलेज परिसरात मनोरा उभारताना पाचव्या थरावरून पडल्याने एका नववीत शिकणाऱ्या मुलाला किरकोळ दुखापत झाली. तसेच, पालिका मुख्यालयासमोर मनोरा उभारताना २३ वर्षांचा एक गोविंदा जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर डोंबिवली पश्चिमेकडील मनोरा उभारताना दोन गोविंदा किरकोळ जखमी झाले.

सुरक्षा नियमांचे उल्लंघन

यंदा अनेक ठिकाणी दहीहंडीसाठी लाखोंच्या घरात बक्षिसांची रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये थरांसाठी तीव्र स्पर्धा दिसून आली. मात्र, या स्पर्धेच्या नादात अनेक ठिकाणी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. उंच थर रचताना हेल्मेट किंवा इतर सुरक्षा साधनांचा वापर न केल्यामुळे अनेक गोविंदांना गंभीर दुखापती झाल्या. दहीहंडी हा एक साहसी खेळ असला, तरी जीव धोक्यात घालून तो साजरा करणे योग्य नाही, हे या घटनांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत