मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता

राज्याची राजधानी मुंबईत (mumbai) प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतलं तापमान (tempreture) सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होईल

मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता
file photoImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 12:34 PM

मुंबई – राज्याची राजधानी मुंबईत (mumbai) प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतलं तापमान (tempreture) सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होईल. सध्या राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (heat wave) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेने जाहीर केली आहे. गोवा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्राला तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्राला 17 मार्चनंतर उन्हाच्या झळा बसेल असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. उष्माघातापासून बजाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे. दुपारी 12 ते 4 या चार तासात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार असल्याने उन्हाचा बचाव करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी विविध उपाय सांगितले आहेत.

  1. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी अशी घ्या काळजी
  2. दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे टाळावे
  3. तुम्हाला तहान लागली नसेल तरी अधिक पाणी प्यावे
  4. शक्यतो हलके, पातळ, आणि सुती कपडे वापरावे
  5. उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करावा
  6. पाण्याची बाटली सोबत ठेवावी
  7. उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर छत्री किंवा टोपीचा वापर करावा
  8. कपड्याने आपला चेहरा झाकावा

मुंबई ठाण्यासह इतर राज्यात तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता

पुढील दोन दिवसात मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट 40 अंशापार जाण्याची शक्यता पुण्याच्या हवामान वेध शाळेने वर्तवली आहे. तापमान वाढल्यास मुंबईकरांना आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामानबाबत एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईत तापमान वाढणा असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर दोन दिवसानंतर हे तापमान हळूहळू कमी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

या कारणामुळे उष्णतेची लाट

गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्याने ही तापमानात वाढ झाली आहे. समुद्र किनारी येणारे वारे उशिरा येत असल्याने कमी झालेली हवेतील आर्द्रता ही देखील तापमान वाढीस कारणीभूत असल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.

‘जलयुक्त’चा घोटाळा : पहिल्या टप्प्यात निलंबन आता थेट अधिकाऱ्यांना अटक, परळीतच मुरलयं पाणी!

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत-विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध, सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.