AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता

राज्याची राजधानी मुंबईत (mumbai) प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतलं तापमान (tempreture) सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होईल

मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता
file photoImage Credit source: google
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 15, 2022 | 12:34 PM
Share

मुंबई – राज्याची राजधानी मुंबईत (mumbai) प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतलं तापमान (tempreture) सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होईल. सध्या राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (heat wave) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेने जाहीर केली आहे. गोवा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्राला तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्राला 17 मार्चनंतर उन्हाच्या झळा बसेल असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. उष्माघातापासून बजाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे. दुपारी 12 ते 4 या चार तासात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार असल्याने उन्हाचा बचाव करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी विविध उपाय सांगितले आहेत.

  1. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी अशी घ्या काळजी
  2. दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे टाळावे
  3. तुम्हाला तहान लागली नसेल तरी अधिक पाणी प्यावे
  4. शक्यतो हलके, पातळ, आणि सुती कपडे वापरावे
  5. उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करावा
  6. पाण्याची बाटली सोबत ठेवावी
  7. उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर छत्री किंवा टोपीचा वापर करावा
  8. कपड्याने आपला चेहरा झाकावा

मुंबई ठाण्यासह इतर राज्यात तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता

पुढील दोन दिवसात मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट 40 अंशापार जाण्याची शक्यता पुण्याच्या हवामान वेध शाळेने वर्तवली आहे. तापमान वाढल्यास मुंबईकरांना आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामानबाबत एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईत तापमान वाढणा असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर दोन दिवसानंतर हे तापमान हळूहळू कमी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

या कारणामुळे उष्णतेची लाट

गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्याने ही तापमानात वाढ झाली आहे. समुद्र किनारी येणारे वारे उशिरा येत असल्याने कमी झालेली हवेतील आर्द्रता ही देखील तापमान वाढीस कारणीभूत असल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.

‘जलयुक्त’चा घोटाळा : पहिल्या टप्प्यात निलंबन आता थेट अधिकाऱ्यांना अटक, परळीतच मुरलयं पाणी!

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

कोण होणार गोव्याचे मुख्यमंत्री? प्रमोद सावंत-विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध, सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार

Follow Us
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...