AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष शेलार म्हणाले, गेला गाळ कुणीकडे?; पालिकेने केला ‘हा’ दावा, दिली आकडेवारी!

महापालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढून नालेसफाईच्या कामाची माहिती दिली आहे. ही माहिती देतानाच महापालिकेने आतापर्यंत 104 टक्के गाळ काढल्याचा दावाही केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, गेला गाळ कुणीकडे?; पालिकेने केला 'हा' दावा, दिली आकडेवारी!
ashish shelar
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 7:44 PM
Share

मुंबई: भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील नालेसफाई आणि गाळावरून महापालिकेवर टीका केली होती. महापालिकेने किती गाळ काढला आणि हा गाळ कुठे टाकला? असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता. महापालिकेने गाळाची आकडेवारी जाहीर करून शेलार यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. (104% desilting of nullahs done, better prepared for monsoon: BMC)

महापालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढून नालेसफाईच्या कामाची माहिती दिली आहे. ही माहिती देतानाच महापालिकेने आतापर्यंत 104 टक्के गाळ काढल्याचा दावाही केला आहे. मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व कामांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे 104 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत 3 लाख 24 हजार 284 मॅट्रिक टन इतका गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या मुदतीत म्हणजे मे अखेरीपर्यंत ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.

टाळेबंदीतही उद्दिष्ट्ये पूर्ण

मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांमधून गाळ काढण्याबाबतचे उद्दिष्ट ठरविले जाते. या आधारावर यंदा गतवर्षाच्या तुलनेत 35 टक्के अधिक गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते महानगरपालिकेने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कोविड – 19 विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि टाळेबंदीचा प्रतिकूल परिणाम नालेसफाई कामांवर होऊ नये, याची पूर्ण दक्षता घेऊन ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

19 हजार 093 वाहनफेऱ्यांद्वारे गाळ वाहून नेला

संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून सुमारे 4 लाख 13 हजार 987 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे ठरविण्यात आले आहे. पैकी, पावसाळापूर्व 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. 31 मे अखेरीपर्यंत एकूण 3 लाख 24 हजार 284 इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. तर 19 हजार 093 इतक्या वाहनफेऱ्यांद्वारे हा गाळ वाहून नेण्यात आला. म्हणजेच पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या 104 टक्के इतका गाळ काढण्याची कामगिरी महानगरपालिकेने पार पाडली आहे.

कोणत्या भागातून किती गाळ काढला?

यामध्ये मुंबई शहर भागात 40 हजार 246 मॅट्रिक टनाच्या तुलनेत 43 हजार 766 मॅट्रिक टन म्हणजे 109 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 2 हजार 125 वाहनफेऱ्यांमधूनन तो वाहून नेण्यात आला आहे. पूर्व उपनगरांचा विचार करता एकूण 96 हजार 908 मॅट्रिक टन उद्दिष्टाच्या तुलनेत 1 लाख 6 हजार 260 मॅट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. याचाच अर्थ सुमारे 102 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. हा गाळ वाहून नेण्यासाठी 5 हजार 964 वाहनफेऱ्या झाल्या आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये 1 लाख 74 हजार 209 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पैकी, 1 लाख 82 हजार 285 मॅट्रिक टन म्हणजेच सुमारे 105 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 11 हजार 004 इतक्या वाहनफेऱ्या करून हा गाळ वाहून नेण्यात आला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

जूनमध्ये 17 हजार 297 मॅट्रिक टन गाळ काढला

ही सर्व कार्यवाही 31 मे पर्यंत म्हणजेच निर्धारित केलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर देखील म्हणजे सध्याच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 17 हजार 297 मॅट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी अधिकाधिक नाले स्वच्छता करून महानगरपालिकेने समाधानकारकरित्या कार्यवाही पूर्ण केली आहे. नाल्यांमधून अधिकाधिक गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

शेलार काय म्हणाले होते?

आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी नालेसफाईची पाहणी करताना पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. नालेसफाईचे पालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले दावे फोल आहेत. अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. काही ठिकाणी तर नाल्यावर जलपर्णी उगवली आहे. त्यामुळे महापालिका 100% चा दावा कसा करू शकते? कंत्राटदारांकडून बीलं काढण्यासाठी दावा केला जातोय पण स्थायी समिती आणि महापौर पण असे दावे करीत असतील तर हे त्यांचे निव्वळ पाप आहे. याला जबाबदार महापालिका प्रशासन ही आहे. वेलारसू नावाचा एक राक्षस या शहरात फिरत असून त्यांनी केलेले फोल दावे आहेत. या वेलारसू यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ रचला आहे. हे दावे करणाऱ्या वेलारसू आणि त्याचे समर्थन करणारे महापौर आणि स्थायी समिती यांना आम्ही मुंबईकरांसमोर उघडे करू. यांच्या घरासमोर आम्ही गाळ नेऊन टाकू, असा इशारा शेलार यांनी दिला होता. तसेच गाळ कुठे टाकला याचे फोटो दाखवण्याचे आव्हानच त्यांनी पालिकेला दिले होते. (104% desilting of nullahs done, better prepared for monsoon: BMC)

संबंधित बातम्या:

मुंबई तुंबू नये म्हणून पालिका अ‍ॅलर्ट; रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

आघाडी सरकारचा ‘कौशल्य विकास’, एका महिन्यात दिला 10 हजार बेरोजगारांना रोजगार

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिकमध्ये दिवसभरात 750 रुग्णांना डिस्चार्ज, 356 नव्या रुग्णांची नोंद

(104% desilting of nullahs done, better prepared for monsoon: BMC)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!